साईड-इफेक्ट

परिस्थिति दिवसेंदिवस खराबच होत आहे. आतापर्यंत फक्त मोठ्या शहरात असलेला धोका बुलढाणा, इस्लामपूर, जळगाव अशा छोट्या शहर व खेडेपर्यंत पसरलेला आहे. स्पेन व इटलीतील बळींची संख्या रोजच 500 -700च्या पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार जनतेला सांगत आहेत की, घराबाहेर पडू नका. स्वतःची काळजी घ्या. 

कदाचित भारत यातील तिसर्‍या टप्प्यावर आहे. संपूर्ण देश 14 एप्रिल पर्यन्त अर्थात 21 दिवसांसाठी लॉकडाउन आहे. या कालावधीत सर्वच बंद आहे. अनेक घटना प्रथमच घडत आहेत. 1974 नंतर रेल्वे प्रथमच इतके दिवस बंद झालीय. सर्व फॅक्टरी, प्रॉडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, सर्विसेस बंद आहेत, सर्व कुटीरोद्योग बंद आहेत. सर्व दुकाने मॉल्स बंद आहेत, बस, एस.टी बंद आहेत. खाजगी गाड्या बंद आहेत. रस्त्यांवरील प्रवासी-मालवाहतूक बंद आहे. (अत्यावश्यक सेवा वगळता), रस्ते निर्मनुष्य आहेत. रस्त्यावर आलेल्या लोकांना पोलिस परत पाठवत आहेत. कदाचित हा 21 दिवसांचा कालावधी निघून जाईल पण त्यानंतर येणारी आर्थिक मंदी मोठी असेल.
देशभरातील मजूर मिळेल त्या साधनांनी व तेही बंद झाल्यामुळे चक्क पायीच आपल्या गावी जाण्यासाठि निघाला आहे. एकूणच समाज व समाजशास्राच्या  दृष्टीने हा एक मोठा relevant व ज्वलंत विषय आहे. कारण एक तर हातावर पोट असणार्‍या मजुरांना दिवसभर कमावले तर रात्री खायला भेटते अशी स्थिति आहे. काम बंद याचा अर्थ आवक बंद मग खायला काय मिळेल? त्यातही बाहेरील सर्व खाद्यपदार्थाच्या गाड्या व हॉटेल्स बंद आहेत. बर ते राहतात त्या ठिकाणी घर म्हणावे असे काहीच नसते. शेवटी नाइलाजाने मोठी शहरे सोडून मजुरांनी गावाकडे जाणे पसंद केले. पण मग मार्ग काय ? मिळेल त्या ट्रक, दूध टँकर, भाजीपल्याची गाडी यातून पण शेवटी जिल्हा जिल्ह्याच्या सीमेवर याही गाड्या तपासण्यात आल्या. त्यातून त्यांना उतरवण्यात आले. झालं.... सजग मीडियाने याची बातमी देतांना 'अमुक इतक्या लोकांना या चेक नाक्यावर पकडण्यात  आले ' अशा स्वरूपाच्या बातम्या दिल्या. पकडण्यात काय पकडण्यात?  ते काय गुन्हा करून पळून जाणारे आरोपी होते?  पकडायला. 
अखेर अनेक मजुरांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला. 300-400-500 किलोमीटर इतक्या अंतरावर घरे असतांना सर्व पर्याय संपल्याने ते पायी निघाले. त्यातही परत मेन हायवेवर चालतांना सापडले तर पकडून परत मेडिकल नेण्यासाठी नेले जात आहे. बर्‍याच ठिकाणी पोलिस विभाग व सामाजिक संस्थांकडून त्यांना जेवण्याची व्यवस्था केली जात आहे. फोटो व विडिओ करून ते परत माध्यमांवर टाकले जात आहेत. एक-दोन दिवस होईल पुढे काय? 
दिल्लीतील व upतील  मजूर पायी जातांना कडेवर लहान मूल असलेल्या स्रिया व डोक्यावर सामानाची गाठोडे असलेले पुरुष पायी चालतांना अनेक नॅशनल चॅनेल्सचे  अॅकर त्यांच्या मुलाखती घेत होते. बाहेरून येणार्‍या गाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना असतांना up त एका ठिकाणी 150-200 मजूर बसलेले असतांना त्यांच्या अंगावर केमिकलची फवारणी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला... हे अमानवीय आहे. पेक्षा सरकारी दवाखान्यात नेऊन त्यांच्या टेस्ट करा फार-तर पण एखादी वस्तूसारखी ट्रीटमेंट मानवाला मिळणे हे भयंकर. 
बर पुढे जाऊन ही मंडळी गावात पोहचली तरी त्यांचे तिथे सर्व काही आलबेल आहे असे नाहीच.  उलट गावातील मंडळी त्यांच्याकडे संशयाने पाहण्याची शक्यताच जास्त. त्यातून रस्ते बंदी सारखे उपाय गावाच्या सीमेवर काही ठिकाणी करण्यात येत आहेत. या सर्वांचा सामना त्यांना करावा लागणार आहे.  
यासाठी स्वतः सरकार, अनेक सामाजिक संस्था व उत्साही मंडळी मदत करीत आहेच. ते चांगलेच आहे पण या गटाचे विस्कळीत स्वरूप, कुठलाही डाटा बेस नसणे व मेनस्ट्रिम सोसायटीबद्दल या मंडळींच्या मनात असलेली भीती-धास्ती व न्यूनगंड यामुळे अनेक जन या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 
बर हे सर्व आवरल्यावर त्यांची  मानसिक सामाजिक व आर्थिक स्थितीचे काय? एका विषाणूने मानवी समाजाची उलथापालथ होऊ लागली आहे. 

No comments:

Post a Comment