माझ्या पुस्तकाचे अनुभव -१


खर तर माझ पुस्तक आणि त्याबाबत काही फारस लिहू नये असे वाटत असते. पण आज लिहिण्यासारखे वाटल्याने लिहित आहे. असेही स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांसाठी ज्ञानपीठ, साहित्य अकादमी आदी छोटे पुरस्कार नसल्याने वा चाळ सम्राट , गल्ली रत्न वैगेरे मोठे पुरस्कार देखील अद्यापपावेतो आयोजित करण्यात आलेले नसल्याने ... आपल्या पुस्तकाची उगाचच का जाहिरात करावी म्हणून मी ते टाळतो.... वरील वाक्यात काही अंश विनोदाचे होते याची नोंद चाणाक्ष वाचकांनी घेतली असावी. आजकाल असे सांगावं लागते...लोक खूपच भावनिक झालेत...चटकन भावना दुखावतात... 
' आधुनिक भारताचा इतिहास - महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात ' असे जरा मोठे नाव असलेले माझे पुस्तक स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी वाचत असतात. त्या निम्मित विविध अनुभव येत असतात. 
परवा कॅरीडोरमध्ये एका सहकाऱ्याशी बोलत उभा असताना एक मुलगा पाहत जवळून चालला होता. तो थांबू की नको या द्विधा अवस्थेत दिसला. मग थांबून त्याला थेट विचारलं की तूला माझ्याशी काही बोलायचे आहे का ? तर त्याने हो म्हटल व तुम्ही महाजन सर ना असे म्हणत तो पाया पडू लागला. त्याला म्हंटले तू थोड्या वेळात केबिनला ये. 
तो आला पण एकदम सायलेंट....म्हणजे अलीकडे धाडकन दरवाजा उघडून आत येत खाडकन खुर्ची ओढून त्यावर रजनी स्टाईल ने बसणाऱ्या नवीन रक्ताच्या तुलनेत हे वेगळंच होत....अलीकडे सवयच झालीय अशी ... असो तर.. मग चर्चअंती समजले की... STI म्हणून तो सात आठ दिवसांपूर्वीच आमच्या ऑफिसला जॉइन झालेला होता. नाशिकच्या आदिवासी सुरगाना तालुक्यातील एक छोट्या खेड्यातील तो आहे. एक दीड एकर कोरडवाहू शेती तो घरात मोठा त्यामुळे जबाबदारी व शिक्षण सोबत सोबत घेतले....त्याचे विशेष म्हणजे तो १० किलोमिटर रानिंग स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर तिसरा आलेला आहे....आता अंतर राष्ट्रीय स्पर्धेची तयारी तो करत आहे ...आणि तो नक्की त्यात यश मिळवेल हे त्याचे पाणीदार डोळेच सांगत होते... त्याचे नावच त्याच्या करिअरला साजेशे होते.. ' भागिनाथ गायकवाड ' 

तो सांगत होता, सर तुमच्या पुस्तकाने माझ्या इतिहासाच्या मार्कात सुधारणा झाली...पुस्तक घ्यायला पैसे नव्हते...दोन तीन जणांकडून उसने पैसे घेतले होते....पुढे खूप काही त्याला बोलायचे होते पण बोलवेना..त्याच्या डोळ्यात पाणी होते ...मी पण स्तब्ध झालो. मग इतर तयारी विषयी बोलून काही मदत लागल्यास हक्काने सांग म्हटल्यास तो प्रसन्न झाला...
काही दिवसांपूर्वी मुंबईहून नाशिक ट्रेनने येत होतो. वरचा बर्थ असल्याने सीएसटी पासून कानात हेडफोन ...आपले 90s साँग प्लेलिस्ट ऐकत पडून होतो..कसारा जवळ गाडी बराच वेळ थांबल्याने थोडे उठून बसलो...खाली एक मध्यम वर्गीय कपल व पलीकडील शीटवरील एक मुलगी यांच्यातील गप्पा रंगात आलेल्या होत्या. ती ताई सांगत होती..त्यांना...खूप काही ...त्या परीक्षा पास होणे खूपच कस खाते...मुलींना तर घरचे लोक खूप कमी वेळ देतात...त्यांना फक्त लिस्ट मध्ये नाव पाहिजे असते...प्री मेन्स असे काही त्यांना कळत नाही..इत्यादी इत्यादी...मग लक्षात आले की तिचे कुठल्यातरी पदावर selection झालेले आहे...
मग मी आपल वरूनच सहज तिला विचारलं,..' ताई कोणत्या पदावर selection झालेले आहे तुझे ? 
ती म्हटली.. PSI
मग वर्ष विचारले...recent दोन तीन वर्षांपूर्वी तिची निवड झाली होती. आता पोस्टिंग मुंबईला होती...
मग पुढे विचारले....म्हटल तू इतिहासाला कोणते पुस्तक वाचले ? 
ती अगदी क्षणात म्हटली.... समाधान महाजन ...
म्हटल तू त्यांना कधी भेटलीस का? 
तिने थोडा वेळ माझ्याकडे पाहिले...मी तिला अंदाज घेऊ दिला....yes... सर तुम्ही आहात...समाधान महाजन... बापरे..एक दोन मिनिट ती काही बोलेचना ...she was completely in shock ..
अशा प्रसंगाच्या अलीकडे सवय झाल्याने...मीच हळूहळू तिला बोलत केला...म्हटल नो problem.. अस काही expected नसत कोण कुठे भेटेल वैगेरे... ती भानावर आल्यावर पहिलं वाक्य बोलली .. सर तुम्ही खूप सुंदर पुस्तक तयार केलेय... आम्ही इतिहासाला दुसरे काही वाचतच नाही...आमच्या पूर्ण PSI बॅच कडून तुम्हाला खूप खूप thank you...
जळगाव सोडण्याच्या आधी एक दोन महिन्यापूर्वीची गोष्ट.... एक सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कार्यालयात होता. दोन तीन जणांच्या निवृत्तीत एक शिपाई असणाऱ्या भल्या माणसाचा देखील त्यात समावेश होता.... कार्यक्रम सुरु होण्या आधी हॉलमध्ये मागे आम्ही उभे होतो...त्यात ज्यांचा कार्यक्रम असतो त्यांचे नातेवाईक देखील येतात त्यामुळे ती मंडळी देखील उपस्थित होती. त्या घोळक्यातील एक मुलगा सारख पाहत होता...मग तो थोडा पुढे आला. मला विचारल...'सर तुम्ही महाजन सर ना..... आणि मग बराच वेळ तो भारावून बोलत राहिला. कार्यक्रम सुरु होण्याची वेळ झाली पण तो बोलताच होता... शेवटी त्याला म्हटले ... today is your fathers day... त्यांच्यासोबत राहा.... कार्यक्रमात मान्यवरांचे बोलणे झाल्यावर हा मुलगा मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे गेला.. आपल्या वडिलांबाबत बोलणे झाल्यावर ... तो थेट माझ्यावर बोलायला लागला....बोलणे संपता संपता तो अगदी निरागस पणे म्हटला कि, 'सरांना इतके लोक ओळखतात कि, सर जर सदाशिव पेठेत उभे राहिले तर निवडून येतील.'.... आम्हाला हसायला आले. सदशिव पेठेतून निवडून येण्या इतका कॉन्फिडन्स असायला निरागस असणेच महत्वाचे आहे बाकी सुज्ञास सांगणे न लागे.... 
थोडक्यात सांगायचे तर पुस्तकामुळे असे रंगीबेरंगी अनुभव येत असतात. बरेच प्रसंग प्रत्यक्ष घडत असतात...हे आपले उदाहरणार्थ वैगेरे....
फोन कॉल्स वरील किस्स्यांचे अजून एक जग आहे.... अगदी गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नांदेड, परभणी ते मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद यातील एकही भाग नसेल जिथून विद्यार्थ्यांनी मला संपर्क केलेला नसेल. पुस्तकानिमित्त एक वेगळी ओळख राज्यभर झाल्याचे कायम जाणवत राहते.  कॉल आल्यावर  बऱ्याचदा पहिले वाक्य हेच ऐकावे लागते...सर तुम्ही नक्की समाधान महाजन सर बोलताय ना...o God..omg .. माझा विश्वासच बसत नाही इत्यादी... एकदा गाडीत with फॅमिली होतो...कॉल आला ..अनोळखी नंबर वरून... Blue thooth असल्याने कारच्या स्पीकरवरून सर्वांना ऐकू जात होते...एका विद्यार्थिनीचा कॉल होता...she was very excited that she talked with जो कोणी समाधान महाजन नामक इसम आहे त्याच्याशी प्रत्यक्ष बोलत असल्याने ..तिचे ते omg करत मोठ्याने किंचाळणे व आश्चर्यमिश्रित आनंदाचे बोलणे ऐकून बायको विचित्र नजरेने पाहण्याच्या आत तिला म्हटल ताई नंतर बोलू आम्ही प्रवासात आहोत....
अगदी रस्त्याने चालतांना, मॉल मध्ये किंवा कुठेही ओळखणारे विद्यार्थी असतात .अलीकडे बायकोलाही अशा प्रसंगांची सवय झाल्याने मी कुठेही गेलो तरी तिला काही वाटत नाही ....कारण माझे विद्यार्थी कुठेही भेटतात याचा ती अनुभव घेत असते...

जळगावला असतांना सुशीलकुमार सोबत इतिहास चित्रपट, वेब सिरीज यावर आभाळ हेपलत असतांना  एखाद्या टपरीवरचा चहा घेत असू... आजूबाजूला सर्व अभ्यास करणारी विद्यार्थी असत एखाद्यावेळा त्यातील काही जन ओळखत .. संवाद होई... पण ओळख न देता झालेला नैसर्गिक संवाद अधिक चांगला राहत असे...  

एक दोन वर्षांपूर्वी गडचिरोली साईड ने एक फोन आला. तो मुलगा सांगत होता सर मागे मी तुम्हाला कॉल केला होता तुम्ही सांगितल्या प्रमाणे तयारी केली होती सर एक जिल्हा भरतीच्या कुठल्याशा जागेवर त्याची निवड झाल्याने तो खूश होता ...खूप भारावून तो बोलत होता...कारण त्याने अभ्यास सुरू केला होता व मी त्याच्या आयुष्यातील प्रथमच असा अधिकारी व्यक्ती होतो ज्याच्याशी तो बोलत होता...पुढे अभ्यास सुरू ठेवतो म्हटला.... त्याच्या लहानशा गावातील तो पहिलाच नोकरी लागलेला मुलगा होता...त्याच्या आनंदात मला सहभागी होता आले हाच आनंद ....नाहीतर गडचिरोलीच्या मुलाच्या आयुष्यात माझ्यासारख्या इतक्या दूर राहणाऱ्या माणसाचे योगदान ते काय असते...हे फक्त त्या पुस्तकामुळे झाले.
कधी कधी माझ्याच पुस्तकाच्या प्रतिक्रिया चेक करण्याची संधी मला पण भेटून जाते. काही दिवसांपूर्वी एका मोठ्या व्यक्तीला माझे पुस्तक द्यायचे होते. त्यांनी भेटायला बोलावले. नेमक माझ्याकडे असलेल्या sample copies संपल्या होत्या. वेळ कमी होता. रस्त्याने जातांना एका पुस्तकाच्या दुकानात गेलो..त्यांना सरळ माझ्या पुस्तकाचे नाव न सांगता विचारले कि, इतिहासाचे एक चांगले पुस्तक पाहिजे.. upsc /mpsc वाले जे वापरतात ते.... त्याने आत आवाज दिला... 'एक समाधान महाजन दे रे... त्यांना म्हटले अहो हे चांगले आहे का पुस्तक पण... ते म्हणे आमच्याकडे सर्वात जास्त हेच विकले जाते... चांगले असेल म्हणूनच लोक घेतात ना...फार वेळ नव्हता.. थोडक्यात बोलून निघालो... 
एकदा यशदामध्ये ट्रेनिंगला गेलो असता... तिथल्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी पुढे चालत होती... त्यांच्या हातात माझे पुस्तक दिसले... त्यांना थांबवून विचारले... कशाचा अभ्यास करता ते म्हटले upsc व राज्यसेवा... त्यांना म्हटले माझा भाऊ अभ्यास करतो. हे इतिहासाचे पुस्तक कसे आहे... त्यांनी सांगितले आम्ही हेच वाचतो इतिहासाला... मी म्हटले माझा भाऊ म्हणतो ... काही खास नाही पुस्तक दुसरे आन असे... . मनातल्या मनात ...'न जाने कहा कहा से चले आते है..लोग ..असा विचार करत त्यांनी एक प्रचंड विचित्र लुक दिला व लगेच ते चालले गेले... 
एक अनुभव असा पण येतो ...काही मित्र, ओळखीचे व नातेवाइकांचे कामासाठी फोन येतात. त्यांची कामे महसूल पोलीस शिक्षण अशा विभागात असतात. मग सबंधित माहिती घेऊन त्या त्या विभागातील अधिकारी उदा. प्रांत, तहसिलदार, dy.sp गट विकास अधिकारी शिक्षणाधिकारी, इत्यादी.. फोन करून कामासाठी मदत करावी अशी विनंती करणारा फोन मी करतांना सुरुवातीला माझे नाव व पद सांगतो ... तिकडून जोरदार आवाज येतो सर तुम्ही ते इतिहासाच्या पुस्तकाचेच महाजन सर ना... मग पुढील काही मिनिट तो अधिकारी आनंदात बोलत असतो. अर्थात त्याच्या इतका आनंद मला पण होतो ... चला नाव लक्षात राहण्यासारखे काहीतरी चांगल काम जीवनात होतेय ... तितकच समाधान. 
 गेल्या काही वर्षापासून  महाराष्ट्रात निवड झालेल्या अनेक क्लास १ क्लास २ अधिकाऱ्यांच्या बुक लिस्ट मध्ये आपल्या पुस्तकाचे नाव कायम असणे हि एक चांगल्या कामाची पावती आहे.. 
 
महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांचे मनःपूर्वक आभार...शुभेच्छा...आपण गेली दहा वर्ष माझ्यावरील प्रेम अबाधित ठेवले. ते पुढेही राहील अशी अपेक्षा... पुढील दहावी आवृत्ती २०२४ पर्यंत येईल... त्या बाबत वारंवार विचारणा होतेय म्हणून इथे सांगतोय. हे पुस्तक आपल्या पर्यंत पोहचविणाऱ्या संपूर्ण युनिक टीमचे मनःपूर्वक आभार. 

- समाधान महाजन

(यात अत्यंत निवडक अनुभव मांडलेले आहेत...जवळपास रोजचेच येणारे फोन कॉल, विविध माध्यमातून येणारे मेसेजेस, अनेक प्रत्यक्ष भेटी व अनेक ठिकाणी होणारे कार्यक्रम यांचा अंतर्भाव यात केलेला नाही.....ते सर्वच लिहायला घेतले किंवा स्क्रीनशॉट टाकायला घेतले तर एक वेगळे पुस्तकच लिहावे लागेल.)

1 comment: