आशा कि लता , तेंडूलकर कि गावस्कर, रफी कि किशोर असले प्रश्न सारखे चर्चेत येत असतात. त्यावर वादही होतात पण याबातीत आम्ही मध्यममार्गी आहोत किंबहुना हे महान व्यक्तित्व सोडून यांच्या काळात थोडे मागे वाटणारे पण थोडा का असेना दमदार परफॉर्मन्स देणारे व्यक्ती आंम्हाला जाम आवडायचे ....मग अलका याज्ञीक, सलमा आगा, बेगम अख्तर असो वा मुकेश, तलत, हेमंतकुमार असो व सौरव, जडेजा, द्रविड असो भारी वाटायचे........याबाबतीत माझ्या एका मित्राशी चर्चा होत असतांना त्याला सांगितल होत कि बघ सूर्य सूर्य असतो सर्वांना तो माहिती असतो त्याचे महत्व माहिती असते पण तरी लोक चंद्रावर प्रेम करतात तितक सूर्यावर करत नाही .....
माधुरी कि श्रीदेवी अस काही विचारल कि आम्ही हे दोन्ही सोडून त्यांच्या काळात कार्यरत इतर तारकांचे कौतुक करायचो....आज श्रीदेवी गेली...जाणाऱ्या माणसाबाबत चांगलच म्हणावं असा संकेत आहे.. कारण चित्रपट सृष्टीला बहुमूल्य योगदान देण्यात व आपल्या आदाकारीने अनेकांना खिळवत ठेवनाऱ्या पद्मश्री श्रीदेवीचा मोलाचा वाटा होता श्रीदेवीला भावपूर्ण श्रद्धांजली.
आमची पिढी हि अशा काळात मोठी होत होती जेव्हा चित्रपटगृह व व्हिडीओ पार्लर यांचा पतनाचा काळ सुरु झाला होता व घराघरात पसरणाऱ्या केबल टीव्ही ने जाळे पसरायला सुरु केले होते ..हा तोच काळ होता ज्याच्या काहीच वर्ष आधी घरावरील अँटीने सरळ करून करून आठवड्यातून एक-दोनदा दूरदर्शन वर दिसणाऱ्या चित्रपटासाठी आतुरलेले आसायचो ....बदल झपाट्याने होत होते ...आमच्या वडीलधाऱ्या मंडळींकडून ऐकलेली चित्रपट व गाणी अगदी स्वतःच्या घरी नाही म्हटले तरी आजूबाजूच्या मित्रांच्या घरी जावून सहज पाहायला मिळू लागली होती.....आणि हा तोच काळ होता जेव्हा आम्ही श्रीदेवीचा अस्त व माधुरी-जुही-काजोल च्या उदयाच्या बातम्या वृत्तपत्रात व आजूबाजूच्या एकूण चर्चेत वाचत वा ऐकत होतो ....
आमच्यासाठी श्रीदेवी हि वडिलधाऱ्या फार फार तर मोठ्या भावाच्या पिढीतील हिरोईन वाटायची ....तिचा चांदणी आमच्यासाठी टेपरेकॉर्डर च्या कसेट कव्हरपुरता मर्यादित होता....पाहायला मिळाला नव्हता व पाहिला हि असता तरी त्या वयात काही कळला हि नसता....त्यामुळे फक्त ऐकू येतील तेव्हडी गाणी ऐकायचो...त्यातही ' मेरे शोना पकडो ..पकडो ...' अस 'तू मेरी चांदणी' गाण्यात ऐकल कि वाटायचं हि काहीतरी बालिश हिरोईन असावी (तोपर्यंत तो चित्रपट व गाण पाहिलेले नव्हते)......लम्हे ऐकूण होतो ....पण त्या अनिल कपूर- श्रीदेवी पेक्षा वन-टू-का-फोर व एक-दो-तीन करणरे अनिल कपूर व माधुरी हि जोडी चांगली वाटायची व आमच्या बाल बुद्धीला पटणारी वाटायची......
नंतरच्या काळातही १९९२-९३ च्या आसपास आलेले डर, बाजीगर या anti हिरो शाहरुखचे व संजय दत्त च्या टाडा मुळे प्रकाशात आलेल्या सडक, खलनायक या चित्रपटांच्या ..नुकतेच पदार्पण करणाऱ्या अजय देवगण ..खिलाडी अक्षय कुमार ...सैफ अलीखान च्या प्रेमात पाढणारी हि पिढी होती मग वेगवेगळी हेअरस्टाईल..कपडे...देहबोली ...फॉलो करण्यासारखा हा काळ होता...व महत्वाचे म्हणजे मग या काळात चर्चेत असणार्या अभिनेत्री होत्या माधुरी.. जुही, काजोल, शिल्पा..अशा
खुदा गवाह हा गाजावाजा करून येणारा चित्रपट अमिताभ व श्रीदेवी ला तारणार असल्याच्या बातम्या वाचायचो पण कधी आला कधी गेला कळल नाही ....वर उल्लेख केलेल्या चित्रपट व अभिनेत्रींच्या गर्दीत श्रीदेवीचे लाडला व गुमराह कधी येवून गेले कळलपण नाही....
नंतर परत एकदा जाणीवपूर्वक पाहण्यात आलेल्या श्रीदेवीच्या चित्रपटामध्ये जुदाईतील कधी हसू येणारी कधी कीव व कधी राग येणारी भूमिका ....चांदनितील मध्यंतरानंतरची भूमिका...बऱ्या वाटल्या व अलीकडची इंग्लिशविंग्लिश मधील भूमिका आवडली...बाकी मि.इंडियात अमरिशपुरी नसता तर साराच लहान मुलांचा चित्रपट वाटला असता...चालबाज ...तोहफा सुमार मनोरंजन होते....
एकूणच पौंगडअवस्थेतील एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडावी जी तिच्या नंतरच्या आयुष्यातही लक्षात राहावी...तशी त्याच काळात वावरत असणाऱ्या अभिनेत्रीही त्याच्या मनोविश्वाचा भाग कळत-नकळत बनत जातात.....आमचा काळ श्रीदेवीचा नव्हता .....इतकच .
पद्मश्री श्रीदेवीला श्रद्धांजLI
- समाधान महाजन.
माधुरी कि श्रीदेवी अस काही विचारल कि आम्ही हे दोन्ही सोडून त्यांच्या काळात कार्यरत इतर तारकांचे कौतुक करायचो....आज श्रीदेवी गेली...जाणाऱ्या माणसाबाबत चांगलच म्हणावं असा संकेत आहे.. कारण चित्रपट सृष्टीला बहुमूल्य योगदान देण्यात व आपल्या आदाकारीने अनेकांना खिळवत ठेवनाऱ्या पद्मश्री श्रीदेवीचा मोलाचा वाटा होता श्रीदेवीला भावपूर्ण श्रद्धांजली.
आमची पिढी हि अशा काळात मोठी होत होती जेव्हा चित्रपटगृह व व्हिडीओ पार्लर यांचा पतनाचा काळ सुरु झाला होता व घराघरात पसरणाऱ्या केबल टीव्ही ने जाळे पसरायला सुरु केले होते ..हा तोच काळ होता ज्याच्या काहीच वर्ष आधी घरावरील अँटीने सरळ करून करून आठवड्यातून एक-दोनदा दूरदर्शन वर दिसणाऱ्या चित्रपटासाठी आतुरलेले आसायचो ....बदल झपाट्याने होत होते ...आमच्या वडीलधाऱ्या मंडळींकडून ऐकलेली चित्रपट व गाणी अगदी स्वतःच्या घरी नाही म्हटले तरी आजूबाजूच्या मित्रांच्या घरी जावून सहज पाहायला मिळू लागली होती.....आणि हा तोच काळ होता जेव्हा आम्ही श्रीदेवीचा अस्त व माधुरी-जुही-काजोल च्या उदयाच्या बातम्या वृत्तपत्रात व आजूबाजूच्या एकूण चर्चेत वाचत वा ऐकत होतो ....
आमच्यासाठी श्रीदेवी हि वडिलधाऱ्या फार फार तर मोठ्या भावाच्या पिढीतील हिरोईन वाटायची ....तिचा चांदणी आमच्यासाठी टेपरेकॉर्डर च्या कसेट कव्हरपुरता मर्यादित होता....पाहायला मिळाला नव्हता व पाहिला हि असता तरी त्या वयात काही कळला हि नसता....त्यामुळे फक्त ऐकू येतील तेव्हडी गाणी ऐकायचो...त्यातही ' मेरे शोना पकडो ..पकडो ...' अस 'तू मेरी चांदणी' गाण्यात ऐकल कि वाटायचं हि काहीतरी बालिश हिरोईन असावी (तोपर्यंत तो चित्रपट व गाण पाहिलेले नव्हते)......लम्हे ऐकूण होतो ....पण त्या अनिल कपूर- श्रीदेवी पेक्षा वन-टू-का-फोर व एक-दो-तीन करणरे अनिल कपूर व माधुरी हि जोडी चांगली वाटायची व आमच्या बाल बुद्धीला पटणारी वाटायची......
खुदा गवाह हा गाजावाजा करून येणारा चित्रपट अमिताभ व श्रीदेवी ला तारणार असल्याच्या बातम्या वाचायचो पण कधी आला कधी गेला कळल नाही ....वर उल्लेख केलेल्या चित्रपट व अभिनेत्रींच्या गर्दीत श्रीदेवीचे लाडला व गुमराह कधी येवून गेले कळलपण नाही....
नंतर परत एकदा जाणीवपूर्वक पाहण्यात आलेल्या श्रीदेवीच्या चित्रपटामध्ये जुदाईतील कधी हसू येणारी कधी कीव व कधी राग येणारी भूमिका ....चांदनितील मध्यंतरानंतरची भूमिका...बऱ्या वाटल्या व अलीकडची इंग्लिशविंग्लिश मधील भूमिका आवडली...बाकी मि.इंडियात अमरिशपुरी नसता तर साराच लहान मुलांचा चित्रपट वाटला असता...चालबाज ...तोहफा सुमार मनोरंजन होते....
एकूणच पौंगडअवस्थेतील एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडावी जी तिच्या नंतरच्या आयुष्यातही लक्षात राहावी...तशी त्याच काळात वावरत असणाऱ्या अभिनेत्रीही त्याच्या मनोविश्वाचा भाग कळत-नकळत बनत जातात.....आमचा काळ श्रीदेवीचा नव्हता .....इतकच .
पद्मश्री श्रीदेवीला श्रद्धांजLI
- समाधान महाजन.


