या कथासंग्रहातील सर्वच कथा छान आहेत. आजच्या काळाची भाषा बोलतात. आजचे प्रश्न मांडतात.
यातील अबॉर्षण कथा एका वेल सेटेल्ड फॅमिलितील. आर्थिक प्रश्न नसलेली. माणसाला पोटाची व थोड्या सुख्वस्तू पानाच्या गरजा संपल्या की दुसरेच प्रश्न सुरू होतात. नवरा बायकोच्या नात्यात काळानुसार होत गेलेले बदल. लग्न झाले .सुरुवातीची उत्सुकता आवेग संपला. कमवायचे काय तेही संपले. एक मेकांच्या आयुष्यात आपण का आहो ? का राहायचं सोबत? माझी तिला किंवा त्याला काळजी आहे का? तीच कीव त्याच माझ्यावर प्रेम आहे का? याची उत्तरं मिळत नाही. संवाद कमी होत जातो. गरजा भागवल्या जातात...
या सर्वांवर नितांत सुंदर भाष्य करणारी कथा आहे ही. ..
काळ करड आकाश हा शब्द येत राहतो. प्रणव च्या कथेत.
ग्लोरिया मधील अलंक्रिता व सीसीडी मध्ये नेहमी येणारे सर. त्यांची एक इच्छा जशी डोंबिवली फास्ट मध्ये लोकल ट्रेन ने कायम प्रवास करणाऱ्या माणसाला शेवटची सीट मिळणे एक स्वप्न असते तसे. इतक्या मोठ्या आयुष्यात मानसिक उलाढालीत कधी कधी मनाच्या किती छोट्या गरजा असतात.
ट ची गोष्ट वाचतांना मुंबई व मुंबईची लोकल डोळ्यापुढे उभी राहते.
प्रत्येक कथा विश्व दर्जेदार आहे. वाचनीय आहे.
- समाधान महाजन
.jpeg)
No comments:
Post a Comment