कविवर्य खलील मोमीन

काही माणसं कायमच मनात अढळ स्थान निर्माण करून जातात. ते जितक त्यांच्या कवितांमुळे होत तितकच त्यांच्यातील माणूसपणा मुळे होते. कवितेत व कवितेबाहेरही एकसारखच असणाऱ्या “निरामय” कवी खलील मोमीन यांचा ३१ ऑक्टोबरला वाढदिवस असतो. त्यांना उदंड व निरोगी आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा (उशीर झालाय …होऊ दे पण भावना महत्वाच्या).
माझ्या “अस्वस्थ क्षणांचे पाश “ या कवितासंग्रहाच्या नावाच फक्त बारसच सरांनी केल नाही तर अत्यंत कठोरपणे okams रेझर वापरून चांगल्या कवितांची निवड पण सरांनी केली.
कविता निवडतांना कवी किरण भावसार यांच्या निवासस्थानी अख्खा दिवसभर मोमीन सरांकडून एक से एक दर्जेदार कवीता ऐकतांना आम्ही भरून पावलो....... फक्त स्वतःच्याच नाही तर महाराष्ट्रातील अनेक कवींच्या कविता त्याच्या अर्थासहित ऐकतांना अस वाटत होत कि मी पहिल्यांदाच कविता ऐकत आहे. तो आवाज, चढ-उतार, भावना, अर्थ , विश्लेषण सार ऐकतांना जाणवत होत कविता मोमीन सरांच्या कणाकणात वसलेली आहे. कवितेवर निखळ प्रेम करणारा हा माणूस तितकच निखळ प्रेम माणसावर पण करत आला आहे.
मराठीच व उर्दूच पण अक्षर इतक सुंदर मी अजून पाहिलं नाही. त्याचं अक्षर आपल्या संग्रही असावं यासाठी काही वर्षांपूर्वी त्यांचे पत्र आपल्याला याव यासाठी कवी धडपडत असत. या वयोमानात त्यांना नवीन असलेल फेसबुक सारख
माध्यम हि ते हाताळतात हे कौतुकास्पद आहेच पण त्यामुळे त्यांची नवीन कविता आमच्या पर्यंत पोहचते हेही नसे थोडके. सुंदर गझल, कविता लिहिणारा …. विना कुंपनाच्या घरात राहणारा व मनमाड सारख्या सतत धडधडत
असणाऱ्या स्टेशनच्या गावी राहणारया मोमीन सरांची लेखणी सदैव धगधगत
राहो हि शुभेच्छा.....

No comments:

Post a Comment