जे पीड परायी जाणे रे .....

बऱ्याचदा असे जाणवते लोक रिलेट करून घेत नाहीत. एकतर त्यांना ते येत नसावं किंवा ते मुद्दाम करत नसावेत. आपल्यासारखाच हाडामासाचा देह समोरच्यालापण आहे व आपल्याला असणाऱ्या भाव भावना देखील त्याला आहेत हे अनेकदा लोकांच्या गावीच नसल्यागत वावरत असतात. 

बऱ्याच gangster मुव्ही पहा. अनेकांचे सहज मर्डर करणाऱ्याला स्वतःचे मरण दिसायला लागले कि किती केविलवाणा चेहरा दिसायला लागतो त्याचा. असे मुव्ही समाजातील घटनांवरून व मानवी स्वभावाच्या स्वाभाविक अभ्यासावरून बनवलेले असतात. 

सिंडलरर्स लिस्ट मध्ये मृत्यूच्या रांगेत उभे असलेले ते लोक आठवा नक्कीच त्यांना मारणारे लोक त्याही वेळी नॉर्मल असतील तेव्हा त्यांना हा मृत्यू रिलेट करता येत नसेल काय? 

अलीकडे मी anarchy हे विलियम dalrymple चे पुस्तक वाचत होतो. शेवटचे जे काही मुघल सम्राट होते त्यातील काहींचे व त्यांचे सरदारांचे मृत्यू डोळ्यात तप्त सळइ घालून, हात पाय तोडून, तुकडे करून असे केले जात. कुठे जात असतील भावना ? 

आपल्याला जे वाटतेय त्यातील थोडे का असेना पण समोरच्याला वाटत असेल इतकी जाणीव देखील आहे कि नाही इतकी माणसे सामान्य जीवनात  क्रूर होऊन जगतात.

हि क्रूरता फक्त मर्डर वा शारीरिक हिंसेपुरती नसती. कोणाला प्रचंड दुखावणे, विश्वासघात करणे, वेळ न पाळणे, शब्द न पाळणे .... अशा खूप काही मानसिक टोर्चारिंग करण्यात देखील समोरचा व आपण यात करोडो मैलाचे अंतर असल्यागत लोक वागत जातात. 

# लिटररी नोंदी १९



No comments:

Post a Comment