रइस च्या निमित्ताने


शाहरुख चा बहुचर्चित रइस पाहिला, अन होत्या नव्हत्या त्या अपेक्षा पण धुळीस मिळवल्या गेल्याच याची देही याची डोळा पहाव लागल. मुळात आपली ताकद ओळखून त्यात सर्वोच्च स्थान गाठन हा अभिनेत्याचा प्रवास असावा लागतो.तो तसा असावा अस त्याच्या चाहत्यांना देखील वाटत असत.शाहरुखच्या बाबतीत अस होतांना दिसत नाही.
मुळात नव्वदच्या दशकात देशातील आर्थिक,राजकीय व जवळपास एकूणच जबरदस्त स्थित्यंतर जगभर सुरु असतांना चित्रपटसृष्टी त्याला अपवाद नसावी. तत्कालीन अमिताभ चा पडता काळ, खान बंधुपैक्की अजून उर्वरित दोन्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे वेगवेगळ्या भूमिका साकारत असतांना व त्यातही आपल काही वेगळ देण्याच्या प्रयत्नात असतांना फौजी व सर्कस च्या दूरदर्शन सीरिअल च्या माध्यमातून स्वतःला सिध्द करत असतांना शाहरुख दिवाना चित्रपटातून भारतीय सिनेमात एक पाउल टाकतो व अवघ्या काही वर्षातच तरुनाईच्या गळ्यातील ताईत बनतो, त्यातही कुटुंबातून कुठलीही चित्रपट सृष्टीची पार्श्वभूमी नसतांना हे कौतुकास्पद होत.
जागतिकीकरण भारताने स्वीकारल्यानंतरच्या लगतच्याच वर्षात दिवाना,बाजीगर,डर,अंजाम यासारखे एक पाठोपाठ एक चित्रपट तरुणांनी डोक्यावर घेतले त्यात बदलत गेलेली एकूणच सर्व परीस्थिती कारणीभूत असावी.
१९७५ हे वर्ष आणीबाणी व भारतातील एकूणच असंतोष पूर्ण स्थितीतील वातावरनात angree yong man अमिताभ चा दिवार मधील उदय हा योगायोग निश्चितच नव्हता.तत्कालीन तरुणांची चीड संताप हा सलीम जावेदच्या वाक्यातून व अमिताभच्या अभिनयातून बाहेर येत होता व नव्या नायकाची सुरुवात होत होती.
१९९१ नंतरच्या अस्थिर काळात अशीच काहीशी आठवण क..क..क..किरण करत नायिकेच्या मागे “तू हा कर या ना कर ...तू है मेरी किरण” म्हणत प्रेमाने जबरदस्त पछाडलेला नायक म्हणून शाहरुख खान कडे बघतांना होते. जो पुढे अंजाम मध्ये हि कायम होता..
एक पूर्ण एनर्जीटिक व्यक्तिमत्व, सळसळता उत्साह, हातांच्या मनगटापासून तर मानेपर्यंत ताईट झालेल्या नसा, डोळ्यात भडकलेली आग, उच्चारातून व देहबोलीतून जाणवनारी प्रचंड महत्वकांक्षा, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्याही भयानक मार्गाचा वापर करण्याइतका बिनधास्तपणा व त्याच मोहक डोळ्यांनी प्रियसिला घातलेली साद व प्रेम करण्याचा आपला स्वतंत्र अंदाज हि ताकद घेऊन तो पुढील अनेक चित्रपटातून सक्सेस होत गेला.
त्याच्या कारकीर्दीच तिसर दशक तो अशा पद्धतीने निभावत नेत असतांनाच त्याच्या सोबतच्या दोन खान बंधूंनी आपआपला मार्ग काळाप्रमाणे बदलण्यास सुरुवात केली होती. चोकलेट बॉय आमिरखान आपल्या गुडीगुडी भूमिका सोडून अधिकच चोखंदळ भूमिका स्वीकारत स्वतःमध्ये अधिकच पूर्णत्व आणण्याच्या प्रयत्नात होता तर सलमान खान आपली बिनधास्त शैली कायम ठेवत wanted, दबंग,सारख्या स्वतःच्या रफटफ व्यक्तित्वाला साजेशा व लोकांच्या पसंतीस उतरणारे चित्रपट करत असतांना शाहरुख मात्र या काळात चाचपडत असतानाचे दृश्य दिसत आहे. यावर्षीचा सलमानचा सुलतान व आमिरचा दंगल त्या दोघांनी आपापले वय, एनर्जी, व क्षमता कामाला लाऊन क्लास व मास प्रेक्षकांची मने जिंकली असल्याचे दिसत असतांनाच
आपला romantik पना वयाला  शोभणार नाही हे समजून तेही न करणारा, हाणामारीच्या प्रसंगातही पूर्वीइतकी एनर्जी नसलेला, पूर्वीचा सळसळता उत्साह हरवलेला शाहरुख रइस मध्ये भलताच केविलवाणा दिसतोय. मुळात रइस पाहतांना once upon time in Mumbai सारख्या सश्क्त चित्रपटाची वारंवार आठवण येते हे रइसच्या पटकथेचे अपयश आहे. gangstar, टोळीयुद्ध, एकाची जागा दुसऱ्याने घेण्याचा सत्तासंगर्ष हा आजवर अनेक चित्रपटातून मुंबईच्या पार्श्वभूमीवर दाखवलेला असतांना यात गुजरातचा प्लॉट निवडल्याने वेगळे काहीतरी दाखवण्याची संधी दिग्दर्शकाने चुकवली आहे. ज्या नवाजुद्दिन सिद्दिकीला सलमान ने त्याच्या किक व बजरंगी भाईजान मध्ये वापरून त्यालाही एक वेगळ्या भूमिकेला उंचीवर नेण्याची संधी दिली त्याच नवाजुद्दींनची भूमिका सुरुवातीला ताकदीची दाखऊन नंतर फक्त फरफटत नेण्याचा दिग्दर्शकीय मूर्खपणा अनाकलनीय आहे.
रइसच्याच सोबत प्रदर्शित झालेल्या कबिल ने मात्र फार अपेक्षा नसतांना चांगलाच धक्का दिला आहे. प्रमोज बघून सुरुवातीला black किंवा तत्सम अपंग व्यक्तींवरील मनाला हात घालून डोळ्यातून पाणी काढणारा तद्दन मसाला चित्रपट असावा अस वाटत असतांनाच मनासोबत डोक्यालाही चांगल समाधान देणारा हा चित्रपट वाटतो.एकीकडे केव्हाही संपला तरी चालेल असा रइस व एकीकडे संपूच नये अस वाटत असणारा कबिल. संपूर्ण चित्रपटात कसलीही उत्सुकता वाटत नसणारा रइस व उत्कनटा कायम ठेवणारा काबील या लढाईत प्रेक्षकांनी काही दिवसातच कबिल ला पसंती दिल्याचे दिसत आहे.
एकूणच शाहरुख ने काळाची पावले ओळखणे आवश्यक आहे.

भाग सहा

नवोदयचे दिवस

एक अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीची गच्ची , आम्ही दोघ , दूरवरून मजीदितील येणारे अल्ला हो अकबरचे आवाज..संध्याकाळ दाटून आलेली, पिवळे दिवे घराघरातून हळूहळू लागत आहेत, मुलांचा खेळण्याचा कलकलाट वाढत आहे,रस्त्यावरून नळामुळे वाहणारे पाणी गटारीच्या पाण्यात बेमालूम मिसळून जात आहे काही घरातून चुलीचा निघणारा धूर या सर्व वातावरणातील उदास पण गडद करत सभोवताली पसरत जातोय अर्धी थंडी अंगाला जाणवतेय पण ती तीतकीच. आताच गेम्स खेळून आलेल्या पटांगनावरच्या पिवळ्या गवतावर दवाचे पाणी पसरू लागले असावे.
 संध्याकाळच्या प्रेअरला दांडी मारून आम्ही इथ काय करत आहोत.
.
.
.
कोपऱ्यातील खोलीतून पेटीचे व तबल्याचे आवाज येत आहेत. आता यावेळी त्या  खोलीत असणारे सर्व उपस्थित हे माझ्यासारखे क्षुद्र पृथ्वीतलावरचे मर्त्य मानव नसून स्वर्ग लोकातून आलेले गंधर्व व अप्सरा त्या ठिकाणी आहेत , त्यांच्या सर्वांच्या आवाजाला एक स्वर्गीय वरदान लाभले असून साक्षात देवाधीपती देवांना संगीत शिकवणारे गुरु त्या ठिकाणी असल्याने त्यातील कोणाचाही आवाज कानी पडणे हा आपल्या कानाकडून झालेला अक्षम्य अपराध आहे अस समजून तिकडे थोडेही न बघता व काहीच ऐकू येत नसल्यागत तिथून फक्त रस्ता नसल्याने अत्यंत नाईलाजाने  त्या खोलीजवळून जाव लागत असल्याचे पाप उरी बाळगत सोबत चालत असलेल्या मित्रांसोबत , “प्यार के कागज पे....किंवा .....नजर के सामने ...किंवा ..... जादू तेरी नजर “ यासारखे अभद्र लोकांसाठी निर्माण केलेली गाणी मनातल्या मनात म्हणत अगदीच कसतरी आम्ही जात असू.
.
.
.
संध्याकाळची कंपल्सरी  स्टडीची वेळ , पावसाळयाचे दिवस ..भरीस भर अंगावर पांढराशुभ्र नेहरू सदरा , पाउस सुरु आहे कदाचित आज दिवस भरापासून कारण सकाळची पी.टी गोडाऊन मध्ये इकडे तिकडे हात पाय तानण्यात अर्थात योगा करण्यात गेल्याच आठवत होत
वरच्या पत्र्यावर पाउस पडल्याचा आवाज व ते पाणी खाली टपटपत वाहून जात असतांना लगतच्याच व्हरानड्यावर त्यातील काही थेंब अंगावर उडत असतांना पिवळ्याधमक बल्ब खाली बसून कसलस न कळणार इंग्रजीच पुस्तकातील डोक्यावरून जाणाऱ्या ओळींचं वाचन म्हणजे अभ्यास सुरु असतांना कोणास ठाऊक का कदाचित वातावरणामुळे अंगात बारीक ताप असावा, कदाचित भूक लागली असावी, कदाचित थकलो असावा ,कदाचित काय वाचतोय ते कळत नसाव, कदाचित कोणी काहीतरी म्हटल्याच वाईट वाटत असावं ..पण मी माझ्या नकळत घरी पोहचलो होतो इथल्या थंडगार वातावरणापेक्षा घरात उबदार वाटत होत, समोरून आई असावी मी आईच्या मांडीवर डोक ठेवल व आई केसांवरून हात फिरवतेय..
एक सणसणीत कानाखाली बसली .. नको त्या वेळी झोप येणे हि महाभयंकर चूक होती. कदाचित रात्र रडण्यात गेली असावी. बर्याचदा कारणच सापडत नाही घटना का अशा घडून जातात. पण आयुष्यात शिकउन जातात इतक पण साध सोप कस म्हणता येईल कि त्या एक आठवण ठेऊन जातात. कारण कधी आठवणी महाभयंकर असतात कधी खूप गोड,हसऱ्या, हलक्या  नाजूक . या हलक्या नाजूक आठवणी मोरपीस अंगावर फिरवल्यासारखा नाजूक स्पर्श देऊ करतात तर काहिंकडे पाहून आताही त्या काळाच्या पडद्याला सरकाव वाटत नाही कारण सत्य नको तितक नग्न असत.
.
.
.

वेळ उन्हाळ्यातील रात्रीची...नुकतच नववीतून दहावीत गेल्याची. नुकताच रात्री १० ला सुरु झालेला १० वीचा चहा  घेऊन वर्गात डोळ्या खाली भल मोठ पुस्तक तास-दोन तास वाचून झाल्यावर गरम होतंय म्हणून व चला आता कॉटवर जाऊन पडू म्हणून आमच टोळक हळूहळू रस्त्यावर येत, मध्येच एखादी ट्रकचा अपवाद वगळता वाहतूक जवळपास बंदच..
भलमोठ गोडाऊन झोपेच्या आधीन झालेले, रस्त्यावरचे काही लाईट मध्येच चमकून जातायत.अनेक दिवसांपासूनच्या उभ्या असलेल्या दोन ट्रकांवर प्रचंड धूळ साचलेली, ग्यारेजचे ऑईल पसरलेले,काही टायरचे तुकडे इतस्त विखुरलेले व इकडे ....
एकदम हसले सर्वच आणि हसतच राहिले..
why the karishma exposed herself in such bold manner in ‘सरकायलिओ खटीया जाडा लगे..’ 
म्हणजे बस का ,
म्हणजे सम्पल का , 
म्हणजे इतकच का , 
म्हणजे अजून काय पाहयाचे राहील, 
इत्यादी इत्यादी ... and once again dance for the road … जाडे मे बलमा प्यारा लागे..हा हा हा तुफानच . 

हा दिवस आहे कि रात्र हा उन्हाळा आहे कि हिवाळा हे आम्हीच आहोत कि अजून कोणी काहीच कळत नव्हत ..हे समोर जे गोडाऊन दिसतेय ना तिथे रहाव वाटत नव्हत काही वर्षांपूर्वी, आम्ही कैदी, आमचा कैदी नंबर, कैद्यांची कायम लाईन आणि शिस्त, हा तुरुंग आहे प्रचंड मोठा, अस सुरुवातीला काही म्हणत ते अस का म्हणत कळत नसे मी इतका टोकाचा विचार कधी केला नव्हता पण सुरुवातीला खूप कोंडल्यासारख वाटायचे आणि आज आता हा रोड डान्स ..
आता कोणी बांधून ठेवलंय आम्हाला ? कोणीच नाही. आता या क्षणी आम्ही इथून जाऊ शकतो का ? तर सहज जाऊ शकतो कारण मुळातच आम्ही रस्त्यावर उभे आहोत. पण आम्ही जात नाहीत , आमच्या मनात असा आता विचारही येत नाहीय. आमच्यातल्या काहींना तर आता कधी घरीही करमत नाहीय .. आता सवय झालीय ..आता सवय झालीय .. आता या सर्व रुटीनची सवय झालीय, पूर्वी  वाटणारा त्रास  आम्ही आता एन्जोय करतोय ..या सर्वातून आम्हला सुटका नकोय कारण आम्ही त्याचा भाग झालोय अन ते आमचा भाग झालंय 
हे नवोदय आम्ही खरच तुझ्या प्रेमात पडलोय.

                              आगामी ‘नवोदयचे दिवस’ या पुस्तकातून
                                                     (समाधान महाजन )

भाग- पाच

मी मला आठवतोय अगदी जसाच्या तसाच ज्या दिवशी नवोदयला जाण्यासाठी पप्पांसोबत निघालो होतो. बसचा प्रवास करतांना खूप आनंद व्हायचा कधीही कुठेही बसने गावाला जायचे ठरले तर मी खुश व्हायचो, कारण खिडकीजवळ बसून बाहेरचे पळणारे दृश्य पाहून छान वाटायचे. आमचा बराचसा प्रवास हा डोंगरातून झाडांच्या गर्दीतून वाट काढत जाणार्या घाटांच्या वळणदार रस्त्यातून व्हायचा, त्यामुळे गाडी सपाटीवर लागली कि नजरेच्या टप्प्यात जितके सामाऊन  घेता येईल तितका माझा अधाशीपणा वाढलेला असायचा.
आज आजूबाजूला खूप छान छान दिसत होत,हिरवीगार शेतं, बांधांवर गच्च हिरवीगार झाडे जरा लांब पाहिलं तर खूप सार पाणी दिसत होत ती एक मोठी नदी असावी, पप्पांना विचारल तर ते म्हटले कि ती या भागातील एक मोठी नदी आहे , सूर्य बराच कललेला होता त्याचे किरण त्या पाण्यावर पडल्यामुळे पाणी अधिकच चमकत होत.सोनेरी प्रकाश सगळीकडे पसरलेला होता , गाडीच्या काचान्वरून तो पार आतपर्यंत येत होता
आज मी एका नव्या शाळेत जात आहे इतकच माहिती होत. आपल घर सोडून तिथे राहायचं आहे  हे कळत होत पण त्याबाबत फारस दुख नव्हत किंबहुना काहीतरी वेगळ घडणार आहे इतकच जाणवत होत ; ते काय घडणार आहे किंवा कस घडणार हेही माहित नव्हत माझ्यापेक्षा कदाचित घरच्या लोकांना त्रास जास्त होत असावा. निघतांना फार काही नाटकीय रडारडीचे प्रसंग झाले नाही पण  जुनी शाळा सोडतांना फार चमत्कारिक म्हणावं अस वाटत होत म्हणजे हे सोडून कुठतरी चांगल्या ठिकाणी आपला नंबर लाग्लाय त्यामुळे सर्व जन आपल कौतुक करत आहेत व त्यामुळे आपण काहीतरी वेगळे आहोत अशी चांगली भावना मनात निर्माण झाली होती सोबतच्या मित्रांच्या व परीचीतींच्या नजरेतून ते सारख जाणवत असल्याने हे सर्व इतक चांगल सोडून मी जिकडे जाणारेय ते कसय याची जाम उत्सुकता होती.मनातल्या मनात मी त्या शाळेविषयी तेथील वातावरणाविषयी कल्पनाचित्र रंगवत असू बर्याचदा कुठून कुठून वाचलेली वर्णन व पप्पा मम्मीनि सांगितलेली माहिती या मनोभौगोलिक पार्श्भूमिवर मी रंगून जात असे
आज हलक हल्क होऊन मी पप्पांच्या जवळ बसलो होतो. तेही आज वेगळेच वाटत होते नेहमीप्रमाणेचा  वडिलांचा कडकपणा त्यांच्यात थोडाही दिसत नव्हता व त्यांचे हे नवे मउशर वागण्याने मला कसतरीच लाजल्यासारख वाटत होत. कदाचित ते आतून पार लोण्यासारखे मऊ झाले असावेत. पण वरील रुबाब व करारीपणा यामुळे त्यांच्या चेहरयावर ते तस काही जाणवू देत नसावेत.
मग मध्येच गाडी थांबे घेत घेत चालू लागली.माझ्या दोन चार मित्रांचे चेहरे डोळ्यापुढे येऊ लागले. मग एक गाव आले, आम्ही तसे आतापर्यंत खूप छोट्या खेड्यात जिथे झोपड्या व कौलारू घरे असतील अशा ठिकाणी राहत असल्याने हे गाव मला तस खूप मोठ वाटत होत..एसटी हळूहळू बस stand वर आली.उतरण्यासाठी मी पप्पांसोबत उभा राहिलो.एक भली मोठी पत्र्याची पेटी व इतर सटर-फटर सामानाची पिशवी त्यांनी घेतली.एसटी च्या पायऱ्या उतरून जिथे पाय ठेवाल त्या ठिकाणी भल्या मोठ्या खड्यात पाणी साठलेले होते.पप्पांनी कसाबसा तो खड्डा चुकवला.मी त्यांच्या मागे उडया मारत चालत होतो, थोड्याच वेळात लक्षात आल कि ते संपूर्ण बसstand असच खड्डयाखड्ड्यांनी भरले होते,  stand म्हणून जुनाट पत्र्याची एक दोन शेड कशी बशी तग धरून उभी होती जिथे जागा सापडेल तिथे गाड्या उभ्या होत्या व जिथे पाय ठेवायला जागा मिळेल तिथे लोक उभे होते.
एव्हाना पप्पा माझ्या पुढे चक्क डोक्यावर पेटी घेऊन व हातात एक पिशवी घेऊन जोरात चालत होते.ते या बाबतीत माझे हिरो होते त्यांना कोणतेही काम करण्याची कधीच लाज वाटत नसे स्वतःचे काम स्वतः करण्यात कसली अआलीय लाज असे ते म्हणत. मला मात्र मजा वाटत होती, बऱ्याचदा पप्पांच्या ज्या हाताने सणसणीत मार खाल्ल्लेला होता त्याच हाताने ते आज माझा सामान उचलून चालत होते.
कधी एकदाच ते नवोदय कस असत ते मला दिसेल याची जाम उत्सुकता लागली होती मी पप्पांना विचारत होतो,थोड्याच वेळात त्यांनी मागे वळून मला हात करून सांगितल,
‘हे आल’
मी पाहिलं,समोर मोकळ्या मैदानाच्या दोन्ही बाजूंला एल आकारात शाळा दिसत होती, दुरूनच निळ्या रंगात रंगवलेली व पांढऱ्या अक्षरात लिहिलेली एक पाटी दिसत होती , तो नीळा रंग ज्यावर जवाहर नवोदय विद्यालय अस लिहिलेलं ती माझ्या आयुष्याची एक मोहोर बनून जाणार आहे हे तेव्हा कुठ मला ठाऊक होत.
आम्ही समोरच्या ऑफिसकडे चालू लागलो, काहीजण शाळेच्या ड्रेस मध्ये तर काही चक्क वेगवेगळ्या रंगातील बनियन व सफेद pant  मध्ये दिसत होती, हा एक  नवीनच प्रकार मी पाहत होतो.
इतक्यात पप्पानी मला आत बोलवलं.
- समाधान महाजन