तत्कालीन भारताची आर्थिक परिस्थिति. देशापुढील प्राथमिकता वेगळ्याच असतांना असा खर्चीक असणार्या प्रकल्पांना मान्यता देणारे तेव्हाचे नेहरूनसारखे पंतप्रधान किती दूरदृष्टीचे होते हे आपल्याला समजते. हा धागा इंदिरा गांधीपर्यन्त जातो. 1974 चे पोखरण पर्यंतचा प्रवास रॉकेट बॉइज 2 मध्ये आहे.
भारत हा एक अद्भुत देश आहे. भारताचा स्पेस रिसर्च प्रोग्रॅम व आण्विक कार्यक्रम पाहिला तर असे दिसते की किती संघर्षातून आपल्याला हा वैभवशाली वारसा मिळाला आहे. होमी भाभा, विक्रम साराभाई, राजा रामन्ना, अब्दुल कलाम ही माणसे म्हणजे एक कर्तुत्वशाली इतिहास रचलेली माणसे आहेत. ही माणसे झपाटलेली होती.
इतिहास हा उगाचच तयार होत नाही. भव्यदिव्य काम करायला व तितके मोठे नाव व्हायला तितकीच मेहनत घ्यावी लागते. कोणतेही मोठे काम करायचे असेल तितके डेडिकेशन लागते. झपाटून देऊन काम करावे लागते. आणि कोणतीही पळवाट शोधता येत नाही. बरीच कामे स्वतःला करावी लागतात.
इतका मोठा इतिहास भारताच्या स्वातंत्र्यानंतर तयार झाला. हे फार मोठे आश्चर्य मानले पाहिजे. याचे महत्वाचे कारण म्हणजे अंतरराष्ट्रीय परिस्थिति वेगळी होती. रशिया व अमेरिका यांच्यातील शीतयुद्धामुळे भारतासारख्या देशांकडे फारसे स्वातंत्र्य त्या बाबतीत नव्हते. हे त्या सिरिज मध्ये देखील दिसते. आजपर्यंत या क्षेत्रातील इतक्या घटना पहिल्यांदाच सामान्य मानसापुढे येत आहेत. होमी भाभा, साराभाई, अब्दुल कलाम, राजा रमान्ना यांच्या बद्दल माहीत नसलेली अनेक सत्य यानिमित्ताने पुढे येत आहेत.
- समाधान महाजन


