पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी जिव्हाळा हे पुस्तक लिहिले आहे. अलीकडेच ते माझ्या वाचण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या लेखक कवींविषयी त्यांनी यात
लिहिले आहे. ते त्यांचे व्यक्तिगत अनुभव
आहेत. पण असे असले तरी
त्यांनी ज्या व्यक्तींबाबत लिहिले आहे त्या व्यक्ती पब्लिक फिगर असल्याने लोकांना
देखील आवडतील असेच अनुभव त्यांनी व्यक्त केले आहेत. आपल्या आवडत्या लेखक कवीविषयी
अधिकची माहिती मिळणे हे वाचकांसाठी आनंददायी असते.
१) पहिला लेख वरदान हा तारा वनारसे
यांच्यावर तर २) दुसरा कलासक्त हा लेख ज्ञानेश्वर
नाडकर्णी यांच्यावर आहे.
३) वलय –
· श्री. पु. भागवत यांच्यावर हा लेख लिहिला आहे. मौज-सत्यकथेवर संपादक म्हणून विष्णूपंत यांचे नाव
असायचे पण खरे संपादकीय सूत्रधार श्री पु अर्थात श्रीकृष्ण पुरुषोत्तम भागवत हे
होते.
· श्रीपू हे १९५४ पासून रुईया कॉलेज मध्ये शिकवू लागले होते. १९८३ ला
सत्यकथा हे मासिक बंद पडले. १९८६ साली ते साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झाले. श्रीपू
महत्मा गांधींना भेटले होते. गांधी जिना बोलणी असफल झाल्यानंतर बिर्ला हाउसमध्ये
वार्ताहर परिषद झाली तेव्हा प्रभात दैनिकाचे संपादक श्री.शंनवरे यांच्यासोबत
श्रीपू तेथे गेले होते. तसेच १९४२ च्या गवालिया tank वरील ऐतिहासिक सभेच्या वेळी ते खूप लहान होते पण तिथे मोठ्या
भावासोबत हजर होते.
· करंदीकरांनी एका लेखात लिहिले, “कविता कशी भोगावी असं विचारलं तर
त्यांच्यासाठी एक ग्राम्य उत्तर असं: ‘कपडे काढून’.” तेच करंदीकर गमतीने
मित्राबद्दल म्हणत असत, ‘आपला श्रीपू काही झाले तरी कपडे काढायला तयार होनार नाही’ (पे.१०४)
४) नंदनवन –
·
हा लेख गंगाधर गाडगीळ यांच्यावर आहे.
·
बॉम्बे बुक डेपो ची स्थापना १९२४ ची.
गाडगीळ, बापट, पाडगावकर, सदानंद रेगे, व करंदीकर हे मित्र होते. ते एकत्र जमायचे. खाणे, पिणे असे कार्यक्रम सुरु राहायचे. गंमतीने ते या गटाला ‘मुर्गी
क्लब’ म्हणत असत.
·
आपटे समूहानंतर गाडगीळांनी वालचंद
समूहात अनेक वर्ष सल्लागाराचे काम केले. १९८३ मध्ये गाडगीळांना ६० वर्ष पूर्ण
झाली.
५) उन पावसाच्या शोधात –
·
वसंत कानेटकर यांच्यावर हा लेख आहे.
वसंतराव यांची पहिली कादंबरी ‘घर’ १९५० मध्ये प्रकाशित झाली.
·
१९५५ च्या काळात ते कॉलेजच्याच
आवारात छोट्याशा घरात राहत होते. १९६७ मध्ये ते शिवाई बंगल्यात स्थायिक झाले. ते
गोखले शिक्षणसंस्थेचे आजीव सभासद होते. १९७१ मध्ये या मेंबरशिपला पंचवीस वर्ष
पूर्ण झाली.
·
वसंतरावांचे लग्न त्यांची मामेबहीण
असलेल्या सिंधुताई यांच्याशी झाले होते. ते त्या दोघांनी स्वतः ठरवले होते.
त्यांना एक मुलगी व एक मुलगा होता. सिंधूताईंचा कवितासंग्रह – ‘ मातीलाही कधीतरी
वाटत...’. नंतर वसंतरावांनी सुमन बेलवलकर
यांच्याशी लग्न केले. मार्च १९९७ मध्ये वसंतरावांना ७५ वर्ष पूर्ण झाली. तेव्हा
नाशिकमध्ये त्यांचा मोठा सत्कार झाला होता.
६) उंच जिथे माथा –
·
दुर्गा भागवत यांच्यावर हा लेख आहे.
·
एखादा अभ्यासाचा विषय त्यांच्या मनात
घोळत असला कि, आपण सांगतो ते कोणाला याचे भान
त्यांना राहत नसे. एकदा दुर्गा भागवत या रामदास भटकळ यांच्या ऑफिसमध्ये गेल्या
असता तिथे अडवाणी नावाचा एक कागदाचा व्यापारी बसला होता. बाई बोलत होत्या. मध्येच
भटकळ कामात इतर कोणाशी बोलत असल्याचे पाहून त्या व्यापाऱ्याला सांगू लागल्या...
·
काही वेळाने त्याला वाटले कि बाईंना
प्रतिसाद दिला पाहिजे म्हणून ते दुर्गाबाईंना म्हणाले, ‘madam, यु राईट ऑल धिस, आय विल गिव्ह यु व्हेरी गुड पेपर टू प्रिंट’
·
दुर्गाबाइंनी महात्मा गांधींना प्रथम
पाहिले ते टिळकांच्या अंत्ययात्रेत. व त्यांचे भाषण ऐकले ते १९२५ मध्ये. गांधींचे
भाषण ऐकून सतरा आठरा वर्षांच्या दुर्गेने आपल्या सोन्याच्या बांगड्या
कस्तुरबांच्या झोळीत टाकल्या होत्या. (पे.२२७)
७) कविवरा –
·
हा कुसुमाग्रजांवरील लेख आहे. भटकळ यांची कुसुमाग्रज
यांच्याशी पहिली भेट नाशकात १९५५ ला झाली. (मी हा विचार करतोय मला आठवते काही
तरी १९९६-९७ च्या आसपास मी नाशिकला आलो होतो, तेव्हाच्या वृत्तपत्रात भरभरून त्यांच्याविषयी आलेले होते. पूर्ण
नाशकात सगळीकडे होर्डिंग बनर लागलेले होते. कशाने ते आठवत नाही पण होते. त्यावेळचे
नाशिक माझ्यासारख्या खेड्यातून आलेल्या युवाकासाठी खूप मोठे शहर होते. १९५५ ला
जेव्हा यांची भेट झाली होती तेव्हा नाशिक कसे असेल. कसे दिसत असेल?...खूप लहान असेल, छोट्या इमारती असतील. गर्दी
कमी असेल. हि लोक कुठे भेटत असतील... कोणत्या रस्त्याने गेले असतील.) तेव्हा शालिमार जवळ कुसुमाग्रजांचे घर होते असा उल्लेख येतो. तात्या
मद्यप्राशानाच्या बैठकीला 'ग्रंथवाचन' म्हणत 'रामायण' म्हणजे 'रम' असाही उल्लेख त्यात आला आहे.
·
सुरुवातीच्या काळात तात्या पत्रकार म्हणून पुण्याला प्रभाकर
पाध्यांच्या स्वदेस मध्ये, रांगणेकरांच्या चित्रा
मध्ये, मुंबईच्या धनुर्धारी मध्ये काम करत होते. शाळा
कॉलेजात असतांना त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. मित्रांनी स्थापन केलेल्या
ध्रुव मंडळान पैसे जमवून त्यांच्या 'जीवनलहरी' या पहिल्या संग्रहाचे प्रकाशन केले. त्यांनी गोदावरी सिनेटोन मध्ये
पटकथा संवाद लेखन केले होते तसेच लक्ष्मणाची देखील भूमिका केली होती. तात्यांच्या
कविता खांडेकरांकडे पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतः प्रस्तावना लिहून १९४२ साली
विशाखा कवितासंग्रह प्रसिद्ध करून घेतला.
·
तरुणपणात तात्या कलंदर वृत्तीचे होते. त्यांना गंगुबाई सोनावणे
यांच्याबद्दल आकर्षण वाटत असले तरी लग्नचा विचार लौकिकदृष्ट्या शक्य नव्हता. बाई
शिक्षिका होत्या. वयाने मोठ्या होत्या. (पेज नंबर २४१)
·
नाशिकमध्ये तात्या व वसंत कानेटकर हे दोन्ही मोठ्या व्यक्ती राहत
होते. पण दोग्घांचे वयक्तिक सबंध चांगले होते. कुसुमाग्रज हे
कानेटकरांपेक्षा दहा बारा वर्ष मोठे होते. वसंत कानेटकर हे कवी गिरीश यांचे
चिरंजीव. वसंतरावांनी आपल्या नाटकात मुक्तपणे कुसुमाग्रजांच्या कवितांचा उपयोग
केला.
· बोरकरांना आपला काविपणा कधी विसरता येत नसे. ‘ते फोन उचलला
कि पोएट बोरकर स्पिकिंग असे म्हणत’ तात्यांचे
उत्तर होते कि, बाकीबा हे फुल टाईम पोएट आहेत तर मी पार्ट टाईम
पोएट आहे’
· तात्यांनी नटसम्राट सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदाही सलग
पाहिले नाही.(पे.२५४) नटसम्राट मधील एक ओळ अशी होती – ‘गंगेने कसे वाहावे ते
ब्रम्हपुत्रेने सांगू नये आणि ब्रम्हपुत्रेने कस वाहावे ते गंगेने’
· तात्यंना साहित्य अकादमी मिळाला तेव्हा ते बारा तेरा
जणांसोबत गाडीवर दिल्लीला गेले होते.
८) आनंद
करंदीकर-
· हा लेख विंदा करंदीकर यांच्याशी संदर्भात आहे.
· करंदीकरांची पहिली वर्ष कोकणात गेली. पुढे शिक्षण आणि
अध्यापन कोल्हापूर परिसरात झाले. मुंबईला आल्यावर ते रामनारायण रुईया कॉलेजात
इंग्रजी शिकवू लागले. १९४९ मध्ये करंदीकरांचा पहिलाच कवितासंग्रह ‘स्वेदगंगा’
प्रकाशित झाला.
· केशवसुतांच्या कविता प्रसिद्ध करायला हरी नारायण आपटे यांना
पुढे यावे लागले. कुसुमाग्रजांची विशाखा खांडेकरांमुळे उजेडात आली.
करंदीकर-पाडगावकर यांचे पहिले कवितासंग्रह प्रसिद्ध करण्यास स्वतः कवींना
जुळवाजुळव करावी लागली. (पेज २७४)
· शिकागो विद्यापीठाची फेलोशिप करंदीकरांना मिळाली होती.
त्यातून ते पुढे इंग्रजी कविता करू लागले होते. ए.के. रामानुजम हे कानडी व इंग्रजी
भाषेतील महत्वाचे कवी होते. विंदांनी रामानुजम यांच्या मदतीने स्वतःच्या कवितांची
इंग्रजी भाषांतरे केली.
९) संधिकाळ –
- हा लेख ग्रेस यांच्याशी संदर्भात आहे.
- ग्रेस यांचे शब्द ‘अनाघ्रात’ किंवा व्हर्जिन असले आणि त्यामुळे त्यांना पूर्वीचे काही संदर्भ नसले तरी खूप
काही सांगून जातात.
- ग्रेस यांच्या पत्नीचे नाव लीलाताई तर मिथीला, माधवी आणि राघव हि त्यांच्या मुलांची नावे होती ज्यांना ते
बाला, बेला आणि बिशू असे म्हणत असत.
- त्यांच्या लेखनात विशेषतः गद्य लेखनात अनेक साहित्यकृतींचा
उल्लेख येतो. त्यात सार्त्र, चक्रधर, गालिब अशा
विविध साहित्य प्रवाहातील थोरांचा उल्लेख असतो.
- युरोपातील फ्रेंच नाटककार सम्युअल बेकेट यांच्या ‘वेटिंग
फॉर गोदो’ नाटकाची थीम काय आहे हे कोणाला समजेना म्हणे! ते नाटक पन्नास वर्ष टिकून
राहिले. त्यानंतरच्या टीकाकरांना कळेना कि पन्नास वर्षांपूर्वी यात न समजन्यासारखे
काय होते.
- ग्रेसच्या कवितातील/लेखनातील तीन वैशिष्ट्य – १. त्यांच्या
कवितात संगीत आणि चित्र अर्थात श्राव्य आणि दृश्य संवेदनांना चाळवणारे उल्लेख
मोठ्या प्रमाणावर येतात. २. ग्रेसच्या कवितेत कलाकृतींचे आणि त्यातील व्यक्तींचे
संदर्भ येतात.ते समजून घेण्यासाठी ती प्रत्येक कलाकृती वाचणे, पाहणे किंवा ऐकणे शक्य नसले तरी योग्य ती संवेदना आपल्यात
निर्माण करता आली पाहिजे. ३. ग्रेसचा शब्दसंभार- अशा शब्दांचा वापर करतात जे
शब्दकोशात पण सापडणार नाही. आपल्याला सापडला तोच त्याचा अर्थ. एका कवीने म्हटल आहे
कि मी ते लिहिलं तेव्हा त्याचा अर्थ मला आणि देवाला ठाऊक होता आता तो फक्त देवाला
ठाऊक आहे.
- शब्द आणि प्रतिमा यांचा अर्थपूर्ण कोलाज करण्याची ग्रेसची
ताकद लक्षात घेणे हि ग्रेसच्या कवितेला भिडण्याची पहिली महत्वाची पायरी आहे.
प्रत्येकाने आपल्या भाववृत्तीनुसार कवितेचा आस्वाद घ्यावा.
- जी.ए. आणि ग्रेस यांची प्रत्यक्ष आयुष्यात कधी भेट झाली
नाही. त्यांच्यातील संवाद जास्त पत्रातून व नंतर फोनवर होत असे.
१०) रणांगण –
स्नेहबंधाच
·
हा लेख विश्राम
बेडेकर यांच्यावर आहे.विश्रम हे नाव त्यांचे मूळ नाव नाही. त्यांचे नाव विश्वनाथ.
लहानपणी त्यांना बाबू म्हणायचे.
·
बेडेकरांची
ब्रम्हकुमारी आणि रणांगण हि पहिली दोन पुस्तके ह.वि.मोटे प्रकाशनाने प्रसिद्ध
केलेली होती. हरी मोटे व विश्राम बेडेकर हे दोन्ही मित्र होते तरी त्यांच्या पत्नी
या सख्ख्या बहिणी होत्या, कृष्णाबाई मोटे व मालतीबाई
बेडेकर असे त्यांचे नाव. दोन्ही खरेमास्तरांच्या मुली होत्या.
·
कृष्णा खरे
यांचे शिक्षण पुण्याच्या शिरूर तालुक्यातील घोडनदी या गावी झाले. तिथ पुढे शाळा
नसल्याने १९१४ मध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना हिंगणे येथील महर्षी कर्वे
यांच्या शाळेत पाठविले. तिथे त्यांना गृहीतागामा हि पदवी मिळाली. त्यांचे व हरिभाऊ
यांचे लग्न १९३१ च्या आसपास झाले. कृष्णाबाईंनी दृष्टीआडची श्रुष्टी आणि मीनाक्षीचे
जीवन हि दोन पुस्तके लिहिली.
·
विश्राम बेडेकर
१८ वर्षांचे असतांना त्यांचे पहिले लग्न झाले. बाळूताई बेडेकर अर्थात विभावरी
शिरूरकर यांनीच हिंदोळ्यावर हे पुस्तक लिहिले होते. बाळूताई या विश्राम बेडेकर
यांच्या मैत्रीण नंतर दुसऱ्या पत्नी. ३० डिसेंबर १९३८ मध्ये त्यांनी लग्न केले. श्रीकांत
हा या दोघांचा मुलगा. बाळूताई या देखील मोठ्या बहिनिसारख्या गृहीतागामा झाल्या.
त्यांच्या इंग्रजी भाषणाची तारीफ सरोजिनी नायडू यांनी देखील केली होती. लीलाताई या बेडेकरांच्या तिसऱ्या पत्नी.
अशा तऱ्हेने
जिव्हाळा या पुस्तकातील व्यक्तिचित्रणाचा सारांश मी माझ्या परीने मला भावाला तसा
लिहिला.
-
समाधान महाजन
१८/१२/२०२२