बदल

दिवस जातात तस आपण हळूहळू काही गोष्टी मिस करतो का स्वतःच्याच? जस आपण आपल्याला चांगलं ओळखतो किंवा ओळखायला लागण्याची सुरुवात होते तेव्हा  आपल्या व्यक्तिमतवातील अनेक बाबी आपल्याला खटकत असतात, हे सुधारल पाहिजे असे वाटू लागत किंबहुना हे नाही सुधारल तर अमुक अमुक ठिकाणी आपल काही खर नाही अशी टोचणी व फेल्युयर मनात घोळत असत....
कालांतराने आपण स्थिर होतो. स्थावर पन होतो. मग आपण हळूहळू विसरत जात असू का?  की आपल्याला काय सुधारायचे  होते?  की आपण त्या सोबत अॅडजस्ट करून घेतो. पण आपण आपल्याला स्वीकारल असलं तरी प्रथमच भेटणारी व्यक्ति नाही न पचवू शकत असल काही. 
मग अशा भेटी नंतर काहीतरी मनाला खात...आपण सोडून दिलय बदलण की काय आस वाटत राहत. हे एक सर्जनशील मनासाठी फारच भयंकर आहे. अस होऊ नये. 
                                                                       - समाधान महाजन 

No comments:

Post a Comment