तर झाल अस कि तेव्हा अत्यंत चर्चेत असलेला रेखाबाईंचा ‘फुल बने अंगारे’ ची व्हिडीओ कॅसेट सरांनी आणलीय व ती रात्रीच्या जेवणाच्या वेळी दाखवणार असल्याची चर्चा ऐकू आली.पेपर व इतर मित्रांकडून सिनेमा चांगला आहे अस कळल्याने आम्ही जाम खुश होतो. अर्थात अशा थोड्या थोड्या कारणांनी आम्ही खूपच खुश असण्याचे ते दिवस होते. संध्याकाळी जेवण संपण्याच्या आत वाढपी काका टेबल वैगेरे आणू लागले आम्ही टीव्ही समोरील मोकळ्या मैदानावर जमा होऊ लागलो, तसतस आमच्यातील जाणकार सिनेरसिक मित्रमंडळींकडून कळत गेल कि या सिनेमात तसली सीन आहेत व ती सीन सिनेमातील मेन आहेत त्यावरच पुढ्च सार काही आहे. झाल जस जस सिनेमा पुढे सरकू लागला आमची उत्सुकता ताणली जाऊ लागली व काही कळायच्या आतच स्क्रीनवरील दृश्य गायब झाली.चित्रपट सुरु झाला तेव्हा रेखाबाई थेट बदले कि भाषा बोलू लागल्या होत्या. काय झाल असावं याचा आम्ही लहान मंडळी अंदाज लावत असतांनाच आमच्यातील थोर सिनिअर मंडळींच्या एका ग्रुपने मैदान सोडले व ते होस्टेल कडे जातांना दिसले अर्थात त्यांना झाला हा प्रकार आवडला नाही अस वाटल.
आजच्या भाषेत सांगायचं म्हटल तर त्यांनी चक्क बहिष्कार टाकला होता.असा प्रकार आजच्या काळात झाला असता तर आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हा अन्याय झाला असे समजून तिकडे JNU ला जस आंदोलन झाल तस आंदोलन या JNV मध्ये झाले असते कि काय अस आज वाटत.पण तेव्हाच आमच ते वातावरण वेगळच होत. कारण सरांची हि सेन्सॉरशिप नंतरही सुरूच होती मग तो दामिनी असो वा फुल बने अंगारे असो वा नंतर आलेले चित्रपट असो.
एकदा झाल अस कि मोहरातील ‘तू चीज बडी है मस्त...’ व हम आपके है कोन मधील ‘दीदी तेरा देवर दिवाना’ हि दोन्ही गाणी एकामागोमाग ऐकू येऊ लागली. शाळेतही येताजाता या दोन्ही चित्रपटातील कुठल ना कुठल गान कोणीतरी म्हणतांना हमखास ऐकू येऊ लागल.मित्र म्हटला कि यापैईकी कुठल गान जास्त हिट असावं. तसी दोन्ही गाणी आम्हाला आवडायची, पण मी त्याला म्हटल कि यातील ‘तू चीज.... हे गान जास्त हिट असेल तर तो म्हणायचा ‘दीदी तेरा देवर... (मुळात गाणे व चित्रपट हा आमच्या दोघातील मैत्रीचा दुवा )
आता प्रश्न असा होता कि या दोन्ही गाण्यातील नेमक कुठल गान हिट हे कस ठरवणार? मग आम्ही आईडिया काढली कि जो समोर येईल त्याला विचारायचे कि यापैईकी कुठल गान तुला आवडते आणि मग आम्ही अनेक जनांना हा प्रश्न विचारला....व बरयाच जणांनी मोहरातील रवीनाच्या त्या गाण्याला पसंती दर्शवली. (त्यावेळी नेमक मला अस का वाटल हे मी कदाचित तेव्हा सांगू शकलो नसतो पण आज एकूणच या क्षेत्राच्या व्यापक अनुभवानंतर याची कारणमीमांसा आज करू शकतो, पण असो तो आजचा विषय नाही.)
तेव्हा नुकताच खिलाडी म्हणून प्रसिध्द झालेला व पुढच्या मै खिलाडी तू अनाडी मध्ये आलेल्या अक्षय कुमार व शिल्पा चे ..चुराके दिल मेरा..च्या आम्ही आतोनात प्रेमात होतो. तो आवाज,गाण्यातील बोल,संगीत व अक्षय-शिल्पाचे नृत्य यातील एकूण एक बाब आवडत होती. त्यामुळे वाचता वाचता एकदम या गाण्याचे संगीत ऐकू आले कि पुढची काही मिनिट श्रद्धांजली दिल्यासारखे जागच्या जागी आम्ही स्तब्द व्हायचो. “........वफाये तो तुमने बहोत मुजसे कि है,किसी और से दिल लगा तो न लोगी......”या आणि पुढील ओळी ऐकतांना ऐन मे महिन्याच्या तापलेल्या मातीवर अचानक पावसाच्या सरी कोसळायला लागल्यावर त्या मातीला जस वाटावं तस वाटत जायचं.
बाजीगर ची फ्रेम, दिल है कि मानता नहि ची कॅप, फुल और कांटे चा हातातील ब्यांड, संजू बाबाची हेअर स्टाइल, सुनील शेट्टी ची बॉडी(तोपर्यंत यासाठी सलमानला मान्यता मिळाली नव्हती) अशा अनेक गोष्टींचे आम्हाला अप्रूप होते. सुदैवाने नववीत असतानाच चष्मा लागल्याने बाजीगर फ्रेम ची हौस पूर्ण झाली. मग कोणी टोमणा दिऊन वा विनोदाने जरी ‘काय बाजीगर’ म्हटल तरी अख्खा दिवस चांगला जात असे रात्री स्वप्नात काजोल वा तत्सम हेरोईन येऊन डोकाउन जात पण सकाळी मोर्निंग पीटी ला जायचे इतके टेन्शन असायचे कि बिचाऱ्या कधी येत अन कधी जात काहीच कळायचे नाही.जाग यायची तेव्हा ग्राउंड वरून पालवे सरांच्या शिट्ट्या यायच्या त्यामुळे झटपट बुटांची लेस बांधून व ती बाजीगर फ्रेम डोळ्यावर सरकावून खड्डे चुकवत ग्राउंडच्या दिशेने पळायचो.
नवोदयला लागलो ते वर्ष 1990. आमच्या त्या टीव्ही वरून खाडी युद्धाचे स्कड मिसाईल ची दिवाळीच्या फटाक्यांसारखी वाटणारी दृश्य आमच्या प्रिन्सिपल सरांमुळे आम्हाला पाहायला मिळाली.म्हणजे ते दिवस तसे जागतिक व भारतीय राजकारण अर्थकारणात व एकूणच विश्वाचा आवाका बदलत जाणारे दिवस होते.बर्लिनची भिंत व त्याविशयीची माहिती सर देत ती भिंत पडली होती.खाडी युद्ध सुरु होते व सर्वात महत्वाचे भारतातील 1991 मध्ये झालेले आर्थिक बदल व स्वीकारलेले जागतिकीकरण.
या जागतिकीकरनाचा आमच्यासाठीचा सर्वात जवळील दृश्य बदल आम्ही समजत असू तो म्हणजे टीव्ही वर सुरु झालेले खाजगी च्यानेल व केबल. खर तर त्याआधी आम्ही सुरुवातीची काही वर्ष सुट्टीत घरी गेल्यावर सर्व जन आपले दूरदर्शन वरील कार्यक्रम पाहायचो व सुट्टीत पाहिलेल्या कार्यक्रमांची चर्चा इकडे आल्यावर करायचो.मग कोणाला कोणता चित्रपट आवडलेला असो कोणाला कोणता तर पार नवीन वर्षाचे कार्यक्रम (कारण आमच्या सुट्ट्या ऐन नाताळच्या आसपास एक-दोन महिने असायच्या) अशी सर्व साग्रसंगीत चर्चा रंगायची.
फारच रडारड दिसत असल्याने डिम्पल चा रुदाली काही मी पहिला नव्हता पण ... ‘दिल हुम हुम करे...’ हे गाणे मात्र खूप आवडल होत,बाकी मित्रांनी तो पहिल्याने मला कससच होत होत व आता परत तो पाहू शकणार नाही याच वाईट वाटत होत. ‘सुरज का सातवा घोडा’ हा नावापासूनच एकदम बकवास चित्रपट असल्याचे एकजात सर्वांचे मत पडले. चित्रहार, छायागीत, सुरभी, व दूरदर्शनच्या अनेकोत्तम सिरीअली पाहून त्यावर चर्चा होत असे.
तर 1991 च्या नंतरच्या काही वर्षातच केबल टीव्ही ने तालुक्यान्पार्यंत आपले जाळे पसरवले त्यामुळे अनेक राहून गेलेले चित्रपट पाहण्याची अभूतपूर्व संधी यामुळे लोकांना मिळाली. आमच्यासाठी झालेला बदल म्हणजे आतापर्यंत फक्त ऐकू शकत असलेलो व चित्रहार किंवा छायागीत मध्ये पाहत असलेलो सर्व गाणी तिन्ही त्रिकाळ टीव्ही मधून आदळू लागली.
पण या केबल च्या जाळ्यांमुळे सर्वांना न जाणवणारा एक मोठाच बदल मला दिसू लागला होता, कारण त्याचे फटके मलाही बसत होते तो बदल म्हणजे करमणुकीच्या क्षेत्रात सरळ सरळ विषमता निर्माण झाली होती ती विषमता म्हणजे ज्यांच्या घरी केबल आहे ते व ज्यांच्याकडे नाही ते,त्यामुळे पूर्वी सुटीहून परत आल्यावर जी एकच चर्चा सर्वांमध्ये सारखी चालायची ती विभागली गेली.तितक्या चर्चेपुरते तरी आपल्या घरी केबल नाही व आपण यांच्या चर्चेत बसू शकत नाही अस वाटून हिरमुसून बाजूला निघून जानाऱ्या मुलांमध्ये मीही होतो.मग क्लोजप अंताक्षरी कशी असेल, किंवा फिलिप्स टोप टेन कस असेल याचा अंदाज बांधून बांधून बोर व्हायचं.
पुढ मला अस जाणवल कि ज्या वेळी आम्ही दूरदर्शनच्या कार्यक्रमांची चर्चा करायचो तेव्हाही मुलांचा एक घटक होताच ज्यांच्याकडे मुळात टीव्हीच काय पण लाईट हि नव्हती..तमाम सातपुड्यात राहणाऱ्या वळवी,गावित,पावरा,भिल,धानका,तडवी यांच्यातील बहुतांश जन यापासून अलिप्त दिसायचे पण हि मंडळी मैदानावर उतरली कि आमच्या तोंडाचा आ मिटता मिटायाचा नाही...
आजच्या भाषेत सांगायचं म्हटल तर त्यांनी चक्क बहिष्कार टाकला होता.असा प्रकार आजच्या काळात झाला असता तर आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हा अन्याय झाला असे समजून तिकडे JNU ला जस आंदोलन झाल तस आंदोलन या JNV मध्ये झाले असते कि काय अस आज वाटत.पण तेव्हाच आमच ते वातावरण वेगळच होत. कारण सरांची हि सेन्सॉरशिप नंतरही सुरूच होती मग तो दामिनी असो वा फुल बने अंगारे असो वा नंतर आलेले चित्रपट असो.
एकदा झाल अस कि मोहरातील ‘तू चीज बडी है मस्त...’ व हम आपके है कोन मधील ‘दीदी तेरा देवर दिवाना’ हि दोन्ही गाणी एकामागोमाग ऐकू येऊ लागली. शाळेतही येताजाता या दोन्ही चित्रपटातील कुठल ना कुठल गान कोणीतरी म्हणतांना हमखास ऐकू येऊ लागल.मित्र म्हटला कि यापैईकी कुठल गान जास्त हिट असावं. तसी दोन्ही गाणी आम्हाला आवडायची, पण मी त्याला म्हटल कि यातील ‘तू चीज.... हे गान जास्त हिट असेल तर तो म्हणायचा ‘दीदी तेरा देवर... (मुळात गाणे व चित्रपट हा आमच्या दोघातील मैत्रीचा दुवा )
आता प्रश्न असा होता कि या दोन्ही गाण्यातील नेमक कुठल गान हिट हे कस ठरवणार? मग आम्ही आईडिया काढली कि जो समोर येईल त्याला विचारायचे कि यापैईकी कुठल गान तुला आवडते आणि मग आम्ही अनेक जनांना हा प्रश्न विचारला....व बरयाच जणांनी मोहरातील रवीनाच्या त्या गाण्याला पसंती दर्शवली. (त्यावेळी नेमक मला अस का वाटल हे मी कदाचित तेव्हा सांगू शकलो नसतो पण आज एकूणच या क्षेत्राच्या व्यापक अनुभवानंतर याची कारणमीमांसा आज करू शकतो, पण असो तो आजचा विषय नाही.)
तेव्हा नुकताच खिलाडी म्हणून प्रसिध्द झालेला व पुढच्या मै खिलाडी तू अनाडी मध्ये आलेल्या अक्षय कुमार व शिल्पा चे ..चुराके दिल मेरा..च्या आम्ही आतोनात प्रेमात होतो. तो आवाज,गाण्यातील बोल,संगीत व अक्षय-शिल्पाचे नृत्य यातील एकूण एक बाब आवडत होती. त्यामुळे वाचता वाचता एकदम या गाण्याचे संगीत ऐकू आले कि पुढची काही मिनिट श्रद्धांजली दिल्यासारखे जागच्या जागी आम्ही स्तब्द व्हायचो. “........वफाये तो तुमने बहोत मुजसे कि है,किसी और से दिल लगा तो न लोगी......”या आणि पुढील ओळी ऐकतांना ऐन मे महिन्याच्या तापलेल्या मातीवर अचानक पावसाच्या सरी कोसळायला लागल्यावर त्या मातीला जस वाटावं तस वाटत जायचं.
बाजीगर ची फ्रेम, दिल है कि मानता नहि ची कॅप, फुल और कांटे चा हातातील ब्यांड, संजू बाबाची हेअर स्टाइल, सुनील शेट्टी ची बॉडी(तोपर्यंत यासाठी सलमानला मान्यता मिळाली नव्हती) अशा अनेक गोष्टींचे आम्हाला अप्रूप होते. सुदैवाने नववीत असतानाच चष्मा लागल्याने बाजीगर फ्रेम ची हौस पूर्ण झाली. मग कोणी टोमणा दिऊन वा विनोदाने जरी ‘काय बाजीगर’ म्हटल तरी अख्खा दिवस चांगला जात असे रात्री स्वप्नात काजोल वा तत्सम हेरोईन येऊन डोकाउन जात पण सकाळी मोर्निंग पीटी ला जायचे इतके टेन्शन असायचे कि बिचाऱ्या कधी येत अन कधी जात काहीच कळायचे नाही.जाग यायची तेव्हा ग्राउंड वरून पालवे सरांच्या शिट्ट्या यायच्या त्यामुळे झटपट बुटांची लेस बांधून व ती बाजीगर फ्रेम डोळ्यावर सरकावून खड्डे चुकवत ग्राउंडच्या दिशेने पळायचो.
नवोदयला लागलो ते वर्ष 1990. आमच्या त्या टीव्ही वरून खाडी युद्धाचे स्कड मिसाईल ची दिवाळीच्या फटाक्यांसारखी वाटणारी दृश्य आमच्या प्रिन्सिपल सरांमुळे आम्हाला पाहायला मिळाली.म्हणजे ते दिवस तसे जागतिक व भारतीय राजकारण अर्थकारणात व एकूणच विश्वाचा आवाका बदलत जाणारे दिवस होते.बर्लिनची भिंत व त्याविशयीची माहिती सर देत ती भिंत पडली होती.खाडी युद्ध सुरु होते व सर्वात महत्वाचे भारतातील 1991 मध्ये झालेले आर्थिक बदल व स्वीकारलेले जागतिकीकरण.
या जागतिकीकरनाचा आमच्यासाठीचा सर्वात जवळील दृश्य बदल आम्ही समजत असू तो म्हणजे टीव्ही वर सुरु झालेले खाजगी च्यानेल व केबल. खर तर त्याआधी आम्ही सुरुवातीची काही वर्ष सुट्टीत घरी गेल्यावर सर्व जन आपले दूरदर्शन वरील कार्यक्रम पाहायचो व सुट्टीत पाहिलेल्या कार्यक्रमांची चर्चा इकडे आल्यावर करायचो.मग कोणाला कोणता चित्रपट आवडलेला असो कोणाला कोणता तर पार नवीन वर्षाचे कार्यक्रम (कारण आमच्या सुट्ट्या ऐन नाताळच्या आसपास एक-दोन महिने असायच्या) अशी सर्व साग्रसंगीत चर्चा रंगायची.
फारच रडारड दिसत असल्याने डिम्पल चा रुदाली काही मी पहिला नव्हता पण ... ‘दिल हुम हुम करे...’ हे गाणे मात्र खूप आवडल होत,बाकी मित्रांनी तो पहिल्याने मला कससच होत होत व आता परत तो पाहू शकणार नाही याच वाईट वाटत होत. ‘सुरज का सातवा घोडा’ हा नावापासूनच एकदम बकवास चित्रपट असल्याचे एकजात सर्वांचे मत पडले. चित्रहार, छायागीत, सुरभी, व दूरदर्शनच्या अनेकोत्तम सिरीअली पाहून त्यावर चर्चा होत असे.
तर 1991 च्या नंतरच्या काही वर्षातच केबल टीव्ही ने तालुक्यान्पार्यंत आपले जाळे पसरवले त्यामुळे अनेक राहून गेलेले चित्रपट पाहण्याची अभूतपूर्व संधी यामुळे लोकांना मिळाली. आमच्यासाठी झालेला बदल म्हणजे आतापर्यंत फक्त ऐकू शकत असलेलो व चित्रहार किंवा छायागीत मध्ये पाहत असलेलो सर्व गाणी तिन्ही त्रिकाळ टीव्ही मधून आदळू लागली.
पण या केबल च्या जाळ्यांमुळे सर्वांना न जाणवणारा एक मोठाच बदल मला दिसू लागला होता, कारण त्याचे फटके मलाही बसत होते तो बदल म्हणजे करमणुकीच्या क्षेत्रात सरळ सरळ विषमता निर्माण झाली होती ती विषमता म्हणजे ज्यांच्या घरी केबल आहे ते व ज्यांच्याकडे नाही ते,त्यामुळे पूर्वी सुटीहून परत आल्यावर जी एकच चर्चा सर्वांमध्ये सारखी चालायची ती विभागली गेली.तितक्या चर्चेपुरते तरी आपल्या घरी केबल नाही व आपण यांच्या चर्चेत बसू शकत नाही अस वाटून हिरमुसून बाजूला निघून जानाऱ्या मुलांमध्ये मीही होतो.मग क्लोजप अंताक्षरी कशी असेल, किंवा फिलिप्स टोप टेन कस असेल याचा अंदाज बांधून बांधून बोर व्हायचं.
पुढ मला अस जाणवल कि ज्या वेळी आम्ही दूरदर्शनच्या कार्यक्रमांची चर्चा करायचो तेव्हाही मुलांचा एक घटक होताच ज्यांच्याकडे मुळात टीव्हीच काय पण लाईट हि नव्हती..तमाम सातपुड्यात राहणाऱ्या वळवी,गावित,पावरा,भिल,धानका,तडवी यांच्यातील बहुतांश जन यापासून अलिप्त दिसायचे पण हि मंडळी मैदानावर उतरली कि आमच्या तोंडाचा आ मिटता मिटायाचा नाही...
-समाधान महाजन