भाग तीन व चार


तर झाल अस कि तेव्हा अत्यंत चर्चेत असलेला रेखाबाईंचा ‘फुल बने अंगारे’ ची व्हिडीओ कॅसेट सरांनी आणलीय व ती रात्रीच्या जेवणाच्या वेळी दाखवणार असल्याची चर्चा ऐकू आली.पेपर व इतर मित्रांकडून सिनेमा चांगला आहे अस कळल्याने आम्ही जाम खुश होतो. अर्थात अशा थोड्या थोड्या कारणांनी आम्ही खूपच खुश असण्याचे ते दिवस होते. संध्याकाळी जेवण संपण्याच्या आत वाढपी काका टेबल वैगेरे आणू लागले आम्ही टीव्ही समोरील मोकळ्या मैदानावर जमा होऊ लागलो, तसतस आमच्यातील जाणकार सिनेरसिक मित्रमंडळींकडून कळत गेल कि या सिनेमात तसली सीन आहेत व ती सीन सिनेमातील मेन आहेत त्यावरच पुढ्च सार काही आहे. झाल जस जस सिनेमा पुढे सरकू लागला आमची उत्सुकता ताणली जाऊ लागली व काही कळायच्या आतच स्क्रीनवरील दृश्य गायब झाली.चित्रपट सुरु झाला तेव्हा रेखाबाई थेट बदले कि भाषा बोलू लागल्या होत्या. काय झाल असावं याचा आम्ही लहान मंडळी अंदाज लावत असतांनाच आमच्यातील थोर सिनिअर मंडळींच्या एका ग्रुपने मैदान सोडले व ते होस्टेल कडे जातांना दिसले अर्थात त्यांना झाला हा प्रकार आवडला नाही अस वाटल.
आजच्या भाषेत सांगायचं म्हटल तर त्यांनी चक्क बहिष्कार टाकला होता.असा प्रकार आजच्या काळात झाला असता तर आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हा अन्याय झाला असे समजून तिकडे JNU ला जस आंदोलन झाल तस आंदोलन या JNV मध्ये झाले असते कि काय अस आज वाटत.पण तेव्हाच आमच ते वातावरण वेगळच होत. कारण सरांची हि सेन्सॉरशिप नंतरही सुरूच होती मग तो दामिनी असो वा फुल बने अंगारे असो वा नंतर आलेले चित्रपट असो.
एकदा झाल अस कि मोहरातील ‘तू चीज बडी है मस्त...’ व हम आपके है कोन मधील ‘दीदी तेरा देवर दिवाना’ हि दोन्ही गाणी एकामागोमाग ऐकू येऊ लागली. शाळेतही येताजाता या दोन्ही चित्रपटातील कुठल ना कुठल गान कोणीतरी म्हणतांना हमखास ऐकू येऊ लागल.मित्र म्हटला कि यापैईकी कुठल गान जास्त हिट असावं. तसी दोन्ही गाणी आम्हाला आवडायची, पण मी त्याला म्हटल कि यातील ‘तू चीज.... हे गान जास्त हिट असेल तर तो म्हणायचा ‘दीदी तेरा देवर... (मुळात गाणे व चित्रपट हा आमच्या दोघातील मैत्रीचा दुवा )
आता प्रश्न असा होता कि या दोन्ही गाण्यातील नेमक कुठल गान हिट हे कस ठरवणार? मग आम्ही आईडिया काढली कि जो समोर येईल त्याला विचारायचे कि यापैईकी कुठल गान तुला आवडते आणि मग आम्ही अनेक जनांना हा प्रश्न विचारला....व बरयाच जणांनी मोहरातील रवीनाच्या त्या गाण्याला पसंती दर्शवली. (त्यावेळी नेमक मला अस का वाटल हे मी कदाचित तेव्हा सांगू शकलो नसतो पण आज एकूणच या क्षेत्राच्या व्यापक अनुभवानंतर याची कारणमीमांसा आज करू शकतो, पण असो तो आजचा विषय नाही.)
तेव्हा नुकताच खिलाडी म्हणून प्रसिध्द झालेला व पुढच्या मै खिलाडी तू अनाडी मध्ये आलेल्या अक्षय कुमार व शिल्पा चे ..चुराके दिल मेरा..च्या आम्ही आतोनात प्रेमात होतो. तो आवाज,गाण्यातील बोल,संगीत व अक्षय-शिल्पाचे नृत्य यातील एकूण एक बाब आवडत होती. त्यामुळे वाचता वाचता एकदम या गाण्याचे संगीत ऐकू आले कि पुढची काही मिनिट श्रद्धांजली दिल्यासारखे जागच्या जागी आम्ही स्तब्द व्हायचो. “........वफाये तो तुमने बहोत मुजसे कि है,किसी और से दिल लगा तो न लोगी......”या आणि पुढील ओळी ऐकतांना ऐन मे महिन्याच्या तापलेल्या मातीवर अचानक पावसाच्या सरी कोसळायला लागल्यावर त्या मातीला जस वाटावं तस वाटत जायचं.
बाजीगर ची फ्रेम, दिल है कि मानता नहि ची कॅप, फुल और कांटे चा हातातील ब्यांड, संजू बाबाची हेअर स्टाइल, सुनील शेट्टी ची बॉडी(तोपर्यंत यासाठी सलमानला मान्यता मिळाली नव्हती) अशा अनेक गोष्टींचे आम्हाला अप्रूप होते. सुदैवाने नववीत असतानाच चष्मा लागल्याने बाजीगर फ्रेम ची हौस पूर्ण झाली. मग कोणी टोमणा दिऊन वा विनोदाने जरी ‘काय बाजीगर’ म्हटल तरी अख्खा दिवस चांगला जात असे रात्री स्वप्नात काजोल वा तत्सम हेरोईन येऊन डोकाउन जात पण सकाळी मोर्निंग पीटी ला जायचे इतके टेन्शन असायचे कि बिचाऱ्या कधी येत अन कधी जात काहीच कळायचे नाही.जाग यायची तेव्हा ग्राउंड वरून पालवे सरांच्या शिट्ट्या यायच्या त्यामुळे झटपट बुटांची लेस बांधून व ती बाजीगर फ्रेम डोळ्यावर सरकावून खड्डे चुकवत ग्राउंडच्या दिशेने पळायचो.
नवोदयला लागलो ते वर्ष 1990. आमच्या त्या टीव्ही वरून खाडी युद्धाचे स्कड मिसाईल ची दिवाळीच्या फटाक्यांसारखी वाटणारी दृश्य आमच्या प्रिन्सिपल सरांमुळे आम्हाला पाहायला मिळाली.म्हणजे ते दिवस तसे जागतिक व भारतीय राजकारण अर्थकारणात व एकूणच विश्वाचा आवाका बदलत जाणारे दिवस होते.बर्लिनची भिंत व त्याविशयीची माहिती सर देत ती भिंत पडली होती.खाडी युद्ध सुरु होते व सर्वात महत्वाचे भारतातील 1991 मध्ये झालेले आर्थिक बदल व स्वीकारलेले जागतिकीकरण.
या जागतिकीकरनाचा आमच्यासाठीचा सर्वात जवळील दृश्य बदल आम्ही समजत असू तो म्हणजे टीव्ही वर सुरु झालेले खाजगी च्यानेल व केबल. खर तर त्याआधी आम्ही सुरुवातीची काही वर्ष सुट्टीत घरी गेल्यावर सर्व जन आपले दूरदर्शन वरील कार्यक्रम पाहायचो व सुट्टीत पाहिलेल्या कार्यक्रमांची चर्चा इकडे आल्यावर करायचो.मग कोणाला कोणता चित्रपट आवडलेला असो कोणाला कोणता तर पार नवीन वर्षाचे कार्यक्रम (कारण आमच्या सुट्ट्या ऐन नाताळच्या आसपास एक-दोन महिने असायच्या) अशी सर्व साग्रसंगीत चर्चा रंगायची.
फारच रडारड दिसत असल्याने डिम्पल चा रुदाली काही मी पहिला नव्हता पण ... ‘दिल हुम हुम करे...’ हे गाणे मात्र खूप आवडल होत,बाकी मित्रांनी तो पहिल्याने मला कससच होत होत व आता परत तो पाहू शकणार नाही याच वाईट वाटत होत. ‘सुरज का सातवा घोडा’ हा नावापासूनच एकदम बकवास चित्रपट असल्याचे एकजात सर्वांचे मत पडले. चित्रहार, छायागीत, सुरभी, व दूरदर्शनच्या अनेकोत्तम सिरीअली पाहून त्यावर चर्चा होत असे.
तर 1991 च्या नंतरच्या काही वर्षातच केबल टीव्ही ने तालुक्यान्पार्यंत आपले जाळे पसरवले त्यामुळे अनेक राहून गेलेले चित्रपट पाहण्याची अभूतपूर्व संधी यामुळे लोकांना मिळाली. आमच्यासाठी झालेला बदल म्हणजे आतापर्यंत फक्त ऐकू शकत असलेलो व चित्रहार किंवा छायागीत मध्ये पाहत असलेलो सर्व गाणी तिन्ही त्रिकाळ टीव्ही मधून आदळू लागली.
पण या केबल च्या जाळ्यांमुळे सर्वांना न जाणवणारा एक मोठाच बदल मला दिसू लागला होता, कारण त्याचे फटके मलाही बसत होते तो बदल म्हणजे करमणुकीच्या क्षेत्रात सरळ सरळ विषमता निर्माण झाली होती ती विषमता म्हणजे ज्यांच्या घरी केबल आहे ते व ज्यांच्याकडे नाही ते,त्यामुळे पूर्वी सुटीहून परत आल्यावर जी एकच चर्चा सर्वांमध्ये सारखी चालायची ती विभागली गेली.तितक्या चर्चेपुरते तरी आपल्या घरी केबल नाही व आपण यांच्या चर्चेत बसू शकत नाही अस वाटून हिरमुसून बाजूला निघून जानाऱ्या मुलांमध्ये मीही होतो.मग क्लोजप अंताक्षरी कशी असेल, किंवा फिलिप्स टोप टेन कस असेल याचा अंदाज बांधून बांधून बोर व्हायचं.
पुढ मला अस जाणवल कि ज्या वेळी आम्ही दूरदर्शनच्या कार्यक्रमांची चर्चा करायचो तेव्हाही मुलांचा एक घटक होताच ज्यांच्याकडे मुळात टीव्हीच काय पण लाईट हि नव्हती..तमाम सातपुड्यात राहणाऱ्या वळवी,गावित,पावरा,भिल,धानका,तडवी यांच्यातील बहुतांश जन यापासून अलिप्त दिसायचे पण हि मंडळी मैदानावर उतरली कि आमच्या तोंडाचा आ मिटता मिटायाचा नाही...
-समाधान महाजन

भाग दोन


तर झाल अस कि एकाचवेळी आम्ही शाहरुख व बजाज गुरुजींच्या प्रेमात पडलो होतो.फिल्मी प्रेमापायी बराच मार व शाळा सोडायची कारवाई झाल्यामुळे ती मुले किती सुधारली याची माहिती नाही पण शाळेसाठी असलेला टिवी त्यानंतर मुलांसाठी उपलब्ध होऊ लागला मग कधी शनिवार रविवार चे दूरदर्शन वरून दाखवले जाणारे चित्रपट वा सुरभी सारखी मालिका पाहायला मिळू लागली.पुढे पुढे तर विडीओ कसेट आणून सिनेमा पाहण्याचे भाग्य हि याची देही याची डोळा आम्हास प्राप्त झाले.
पण त्या कॅसेट मधील सर्वच्या सर्व दृश्य अबाधित पणे पाहण्याचे भाग्य आमच्या नशिबी नव्हते.कारण चित्रपट जरी सेन्सॉर बोर्डने मान्यता प्राप्त असला तरी असली सेन्सॉर आमच्या शाळेत होता.शाळेचे आमचे सर्वांचे आवडीचे आदरणीय व प्रचंड धाक व जरब असलेले (हे सर्व गुण व याहीपेक्षा अनेक गुण त्यांच्यात असल्याने तेव्हाची विद्यार्थी , जी आज मोठी असून अनेक क्षेत्रात काम करत असली तरी प्रिन्सिपल सरांचे नाव निघाले कि अत्यंत भाउक होऊन बोलायला लागतात.कारण असा शिक्षक पुन्हा होणे नाही अस सर्वांच मत आहे......पण असो त्यांच्याविषयी नंतर कधी.तर आता ज्या वयात तिथे आम्ही होतो तेव्हा इतकी समज नव्हतीच त्यामुळे त्यांच्या काही बाबी आवडायच्या नाहीत म्हणजे नाहीच.)
तर एखादा चित्रपट मुलांना दाखवायचे ठरले कि आधी सर स्वतः घरी पहायचे व त्यांना जो जो भाग आक्षेपार्ह वाटायचा तो तो भाग ते खूपच फास्ट फोरवर्ड करून ठेवायचे त्यामुळे चित्रपट पाहतांना तीन चारदा तरी स्क्रीन वर काहीच दिसायचे नाही फक्त उभ्या आडव्या रेषा जोरात पळत जायच्या व त्यांना नको असलेला भाग संपला कि मग चित्रपट दिसू लागायचा,यासाठी ते कोणत टेक्निक वापरतात याविषयी आमच्यात प्रचंड कुतूहल होत.(आजकाल लहान मुलांच्या डोळ्यावर टीव्ही तून काय काय येऊन आदळते याचा विचार केला कि मला सर हमखास आठवतात व आमचे डोळे व मानसिकता जपण्यासाठी त्यांनी काय काय केल याचा विचार केला कि त्यांचे अतोनात कौतुक करावेसे वाटते.त्यांनी जे तेव्हा केल ते आम्ही आजही आमच्या मुलांसाठी करत नाही)
तर व्हायचं अस कि पाहता पाहता सर्वजण ऐन रंगात आले कि एकदम स्क्रीनवर उभ्या-आडव्या पट्ट्या सुरु व्ह्याच्या व सगळ्यांचा रसभंग व्हायचा.
एकदा याविषयी मी आमच्या सिनिअर्स च्या गप्पा ऐकत होतो त्यातील एक-दोघांचे मत होत कि, ' आपल्यावर वाईट संस्कार होऊ नयेत म्हणून सर अस करतात, काहीजण म्हणत होते कि जे जस आहे तस दाखवायला काय हरकत आहे,शेवटी एकाने चर्चेचा शेवट करत म्हटल कि,
'' ठीक आहे आपल्यावर चांगले संस्कार होण्यासाठी सर अस करतात पण मग ते पाहत असतांना व कट करतांना सरांवर जे संस्कार होतात त्याच काय??.."
अर्थात मुद्दा अगदीच बिनतोड वाटल्याने चर्चा थांबली.पण त्याच उत्तर काही डोक्यातून जाईना.मग जेव्हा केव्हा चित्रपट पाहतांना असे कट केलेले सीन दिसायला लागले कि मी हळूच मागे वळून सरांच्या तोंडाकडे पाहून घेत असे पण त्यांच्या त्या करारी व कडक चेहऱ्यावरून असे सीन पाहून त्यांच्यवर नेमके कोणते संस्कार झालेयत याचा काहीच अंदाज मला येत नसे.
मग मी आमच्या त्या सिनिअर मंडळींच्या ग्रुपकडे पाहत असे,अशावेळी ते एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत. स्क्रीनवर हिरो-हेरोईन जवळ आले कि त्यांचे ओठाला ओठ लागण्याआधी आमच्या टीव्ही वर चित्र गायब होत असे. या प्रकारामुळे मि.इंडिया सारखा सिनेमा पाहतांना त्यात असलेले (कु)प्रसिध्द गाणे ‘काटे नाही कटते हैं....’ हे आम्ही पाहू शकलो नाही याचे शल्य अनेक दिवस आम्ही उराशी बाळगून जगत होतो. याची इतकी सवय झाली कि पुढे मोठा झाल्यावर ती शाळा सुटली व दुसरीकडे कुठे चित्रपट पाहत असलो कि हिरो-हिरोईन जवळ आले कि वाटे आता चित्र गायब व्हइल पण ते सुरूच राहायचे मग मी डोळे बंद करून घ्यायचो. डोळे पूर्ण उघडे ठेऊन अशी दृश्य पाहिपर्यंत बराच मोठा झालो होतो.
-समाधान महाजन

भाग एक

नवोदयचे दिवस
------------------
नाईनटीज मेलडी म्हणून आजकाल ऐकले जाणारे गाणे आम्हाला सदा सर्वकाळ कुठूनही ऐकू यायचे काळी-पिली, हॉटेली, पान टपरी, लग्नकार्य, सर्कस कोणत्याही माध्यमातून ते आम्हाला पोहचायचे त्यात धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना...., प्यार के कागज पे दिल कि कलम से .....,धीरे धीरे प्यार को बढाना है ... अथवा तू चीज बडी है मस्त.... वा बाजीगर ओ बाजीगर...... वा चुरा के दिल मेरा गोरिया चली.......
यांच्यापैकी कोणतेही वा यासारखे कोणतेही गाणे आम्हाला बसल्या जागेवरून आकर्षून घेत असत, त्या गाण्याच्या आवाजाकडे अक्षरशः कानात प्राण आणून ऐकायचो, तसे ते दिवस वेगळेच होते प्रत्येक दिवस वेगळाच येऊन उगवायचा क्षण क्षण कणभर मोठं झाल्याचा भास व्हायचा,आज या गावावर उगवलेले आभाळ दुसरीकडे नसणारच असा दांडगा आत्मविश्वास घेऊन वावरायचो तरी हि असली गाणी म्हणजे आमचा कॉमन विकपॉईंट
नवोदयच्या त्या मोकळ्या मैदानात सकाळचा वर्ग बाहेरील गवतावर भरला कि अभ्यास होवो कि नको पण एक नक्की व्हायचं कि असल कुठलतरी गाणं हमखास कानी पडायचं अन मन खुश होऊन जायचं,आमचे टीचर लोक कोणास ठाऊक सातवी आठवी नववी म्हणजे लहान समजत असत.
पण आपल्या शाळेच्या तमाम मुलींना मग ती ज्यु. असो कि सिनियर तिला दीदीच म्हणायचे या जगावेगळ्या प्रिंसिपली फतव्याने आम्हाला कोण वेदना व दुःख होत असतील ते आमचे आम्हीच जाणोत.
तर या अतीव फिल्म प्रेमापायी शाळेचं व होस्टेलच कम्पऊंड ओलंडण्याची परवानगी नसतांनाही भिंतीवर उड्या मारून गावातील पलीकडील विडिओ पार्लर वर जाऊन चित्रपट पाहण्याच्या भयानक गुन्हयामुळे फस्ट बॅच च्या चार पाच सिनिअर भैया लोकांना भरे असेम्बली बेइज्जत होऊन पुन्हा देशमुख व अहमद गुरुजींच्या काठीचे फटके खाऊन मग शाळा सोडावी लागल्याचं दृश्य पहिल्याच वर्षी पाहिल्याने आपण कधी स्वतः जाऊन बाजारातील विडिओ पार्लर वर चित्रपट पाहत असल्याचं स्वप्नातही कधी आलं नाही.
पण मग गावातील सालाबादप्रमाणे भरणारी यात्रा आली कि तिथे येणारे ओपन थेटर व त्यातून संध्याकाळ पासून येणारा गाण्यांचा आवाज फुल बिजी शेड्युल मधून हि मनात येऊन तरंग उमटवून जायचा, मग गुरुजी लोकांच्या शिस्तीत जत्रेतील सर्कस पाहायला इन टू वा इन थ्री या अस्सल नवोदयीन कडक लाईनीत जातांना आपसूकच नजर सिनेमाच्या पोस्टर वर जाई व मग पोटात एकदम कायच्या काय होऊन जाई.
तेव्हा एकदम कळलं तेव्हा अक्षय कुमार,सुनील शेट्टी,सैफ अली खान,हि मंडळी जोरात होती सलमान ला मैंने प्यार किया नंतर थेट साजन मध्येच पाहिला होता,
एकदा मी व माझा मित्र गावात एका दुकानावर पेन घ्यायला गेलो होतो,बाजूलाच कॅसेट चे दुकान होते तेव्हा कॅसेट चे दुकान म्हणजे जणू मुंबईच्या फिल्म इंडस्ट्री ने गावोगावी त्यांची उघडलेली आउटलेट च जणू इतका त्यांना मान होता.त्यामुळे टिप्स व्हीनस सारख्या कॅसेट च्या मोठमोठ्या कव्हर वरील पोस्टर दुकानाच्या बाहेरील बाजूस हमखास येणाऱ्या जाणाऱ्याला दिसावीत अशी ठेवली जात.तर असेच एक मोठ्या पोस्टरवरील फिल्म च नाव आम्ही बराच वेळ वाचायचा प्रयत्न करत होतो पण ते जमत नव्हत.DARR या नावाचे आम्ही अनेक उच्चार करून पहिले दार,ड्ररर, दरर, पण ते बोलून आमचे आम्हीच हसत होतो,इतक्यात आमचं लक्ष एकदम बजाज गुरुजींवर गेले बजाज आडनावाचे हे नवीनच आलेले गुरुजी एकदमच उत्साही होते,त्यांना आम्ही हिम्मत करून विचारूनच टाकले कि हे नाव काय आहे, त्यांनी नुस्ते नावच वाचून सांगितलं नाही तर त्यात शाहरुख खान नावाचा हिरो आहे व तो सिनेमा अमक्या तमक्या तारखेला रिलीज होत आहे इतकी सविस्तर माहिती पुरवल्यामुळे आम्ही जाम खुश झालो त्या गुरुजींचे एखादी सायन्स चे चाप्टर संपूर्ण समजून जितका आनंद झाला नसता तितका आनंद डर नामक सिनेमाच्या बहुमोल माहितीमुळे आम्हाला झाला, अर्थात यानंतर हळू हळू आम्ही शाहरुखच्या जवळ व बजाज गुरुजींपासून दूर जायला लागलो अर्थात त्यालाही कारण होतच.

समाधान महाजन