बेगमजान व भारत पाक फाळणी
बेगमजान आला अन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला सेन्सॉर पासून तर थेट अंगावर येणाऱ्या संवादांपर्यंत तसेच विद्या बालन व नसिरुद्दीन सहित इतर अभिनेत्यांच्या अभिनयापर्यंत. आणि त्या चित्रपटाचा एकूणच आवाका
लक्षात घेता अस होण साहजिकच होत, या सर्व गदारोळात जरा कमी चर्चेला गेलेला विषय होता भारत पाकिस्तानची फाळणी;
किंबहुना फाळणी नसती तर हि कथा अशी बनली नसतीच. भारत- पाक फाळणीमुळे तत्कालीन समाजाला एकूणच राजकीय सामाजिक आर्थिक तसेच व्यक्तिगत रित्या किती गंभीर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले याचे चित्रण अनेक कथा कादंबरया कविता व काही तत्कालीन चित्रपटांमध्ये आले आहे. आणि अजून येत आहे.
लक्षात घेता अस होण साहजिकच होत, या सर्व गदारोळात जरा कमी चर्चेला गेलेला विषय होता भारत पाकिस्तानची फाळणी;
किंबहुना फाळणी नसती तर हि कथा अशी बनली नसतीच. भारत- पाक फाळणीमुळे तत्कालीन समाजाला एकूणच राजकीय सामाजिक आर्थिक तसेच व्यक्तिगत रित्या किती गंभीर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले याचे चित्रण अनेक कथा कादंबरया कविता व काही तत्कालीन चित्रपटांमध्ये आले आहे. आणि अजून येत आहे.
फाळणी हे जगाच्या इतिहासातील अत्यंत भयंकर, क्रूर, गंभीर व रक्तपाताने माखलेले पान आहे. पुस्तकासोबतच आमच्या पिढीने फाळणी अनुभवली ती गदर मध्ये. नावाप्रमाणेच ती एक व्हायलेंट स्टोरी जरी दाखवली गेली तरी प्रेताने भरलेली ट्रेन तिकडून येते व इकडून माणस घेऊन जाणारी ट्रेन तिकडे
जाईपर्यंत परत प्रेतांनी भरून जाते हे सत्यच तर होते.
जाईपर्यंत परत प्रेतांनी भरून जाते हे सत्यच तर होते.
खुशवंत सिंग यांच्या ट्रेन टू पाकिस्तान मध्ये अनेक बारकावे टिपले गेले आहेत. १९७३ मध्ये आलेल्या ‘गरम हवा’ चित्रपटातही फाळणी , राजकारण याबाबत खूपच चित्रण
केले आहे. इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी बऱ्याचदा विचार करतो हि घटना अशीच आजच्या काळात घडली असती किंवा ज्या काळात घडली त्या काळात आतासारखी माध्यम व
२४*७ चालणारी न्यूज च्यानेल असती तर काय काय झाल असत, कॅमेऱ्यांनी काय काय टीपल असत व निवेदकांनी काय काय सांगितल असत, रात्रीच्या चर्चा- संवाद
कशा रंगल्या असत्या.....असो इतिहासात जर तर नसतोच कधी, जे झाल ते झाल. बदलायचीच असेल तर फक्त पाहण्याची नजर बदलावी लागेल कारण घटना त्याच
आहेत.
केले आहे. इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी बऱ्याचदा विचार करतो हि घटना अशीच आजच्या काळात घडली असती किंवा ज्या काळात घडली त्या काळात आतासारखी माध्यम व
२४*७ चालणारी न्यूज च्यानेल असती तर काय काय झाल असत, कॅमेऱ्यांनी काय काय टीपल असत व निवेदकांनी काय काय सांगितल असत, रात्रीच्या चर्चा- संवाद
कशा रंगल्या असत्या.....असो इतिहासात जर तर नसतोच कधी, जे झाल ते झाल. बदलायचीच असेल तर फक्त पाहण्याची नजर बदलावी लागेल कारण घटना त्याच
आहेत.
म्हणूनच अलीकडील subaltern history (अन्तःस्तरातील इतिहास) सांगण्याचा प्रयत्न सर्व बाजूने होत आहे. यात पृष्ठभागाकडील (किंवा परिघावरील) घडामोडींचा आढावा घेतला जातो. गाभ्याकडून परीघाकडे जाण्याऐवाजी परीघाकडून गाभ्याकडे अशी उभारणी केली जातेय थोडक्यात नीचे से देखो असे सूत्र वापरले
जात आहे. उगाचच मोठ्या व्यक्तींच्या माध्यमातून मोठ्या घटना न सांगता लहान लहान प्रसंग व गावागावात घडलेल्या घटनाचा व व्यक्तींचा प्रभावी वापर करून त्या त्या काळातील घटनाच पट समोर मांडण्यात येतो. बेगमजान हा असाच subaltern इतिहास सांगणारा चित्रपट आहे असे मला वाटते.
जात आहे. उगाचच मोठ्या व्यक्तींच्या माध्यमातून मोठ्या घटना न सांगता लहान लहान प्रसंग व गावागावात घडलेल्या घटनाचा व व्यक्तींचा प्रभावी वापर करून त्या त्या काळातील घटनाच पट समोर मांडण्यात येतो. बेगमजान हा असाच subaltern इतिहास सांगणारा चित्रपट आहे असे मला वाटते.
बरोबर ज्या ठिकाणाहून सीमारेषा आखली जाणार आहे त्याच रेषेवर एक व्येश्यागृह चालवणारी बेगमजान अर्थात विद्या बालन तिच्या सोबतच्या पाच दहा मुली व आता याच रेषेवरून सीमारेषेचे बांधकाम करण्यास व पुढील रेषा आखण्यास आलेले त्यातल्या त्यात लोकल स्तरावरील अधिकारी यांच्यातला संघर्ष अस वरवर पाहता वाटू शकत परंतु जसजसा चित्रपट पुढ सरकतो तसतस तो
बारीकसारीक संदर्भांचे चित्रण करत चालतो.
बारीकसारीक संदर्भांचे चित्रण करत चालतो.
जस कि सीमारेषा आखण्यासाठी आलेला अधिकारी वर्तमानात काय घडतंय याशी रिलेट न करता फिरणाऱ्या
तबकडीवरील जुन्या काळातल एक गान ऐकत तो नकाशावर काम करत असतो. असाच एक प्रसंग ट्रेन टू पाकिस्तान मध्ये सीमारेषेच्या भागात भेटीला जाणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ आय.सी.एस. अधिकार्यांच्या साग्रसंगीत दौर्याबाबत खुशवंत
सिंग यांनी रेखाटला आहे. पुढे लहानपनीचे मित्र असलेले पण एकाच वेळी हिंदू मुस्लीम असून दोघानाही सोबत आपापल्या देशासाठी काम कराव लागत तेव्हा एक बाजूला जुनी मैत्री व एक बाजूला कर्तव्य अशा कात्रीत ते सापडले असतांना फाळणीच्या दंगलींमुळे त्या दोघांच्या कुटुंबावर झालेले अत्याचार ऐकतांना या वेळी हिंसेला उत्तर हिंसा नसते किंवा हिंसेची फळे दोघांनाही भोगावी लागतात हे सांगायला कोण
महात्मा किंवा नेताजीची गरज राहत नाही न सांगताही हा सिग्नल प्रेक्षकांच्या सरळ लक्षात येतो.
तबकडीवरील जुन्या काळातल एक गान ऐकत तो नकाशावर काम करत असतो. असाच एक प्रसंग ट्रेन टू पाकिस्तान मध्ये सीमारेषेच्या भागात भेटीला जाणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ आय.सी.एस. अधिकार्यांच्या साग्रसंगीत दौर्याबाबत खुशवंत
सिंग यांनी रेखाटला आहे. पुढे लहानपनीचे मित्र असलेले पण एकाच वेळी हिंदू मुस्लीम असून दोघानाही सोबत आपापल्या देशासाठी काम कराव लागत तेव्हा एक बाजूला जुनी मैत्री व एक बाजूला कर्तव्य अशा कात्रीत ते सापडले असतांना फाळणीच्या दंगलींमुळे त्या दोघांच्या कुटुंबावर झालेले अत्याचार ऐकतांना या वेळी हिंसेला उत्तर हिंसा नसते किंवा हिंसेची फळे दोघांनाही भोगावी लागतात हे सांगायला कोण
महात्मा किंवा नेताजीची गरज राहत नाही न सांगताही हा सिग्नल प्रेक्षकांच्या सरळ लक्षात येतो.
त्याचप्रमणे जगात दंगल कुठेही असेल तरी त्यात सर्वाधिक बळी पडणारा व अत्याचार होणारा घाटक स्रीच असते.
बेगमजान सोबत राहानाऱ्या मुली अशाच अत्याचारपिडीत आहे ज्यांचा आक्रोश तोंडातून बाहेर निघायला पण घाबरतो.
बेगमजान सोबत राहानाऱ्या मुली अशाच अत्याचारपिडीत आहे ज्यांचा आक्रोश तोंडातून बाहेर निघायला पण घाबरतो.
सआदत हसन मंटो च्या कथेच्या आधारे या चित्रपटाची रचना करण्यात आली आहे. मुळात फाळणीवर मंटोने अनेक लघुकथा लिहिल्या आहेत,त्यातील 'मिस्टेक' नावाची लघुकथा इथे मला सांगावी वाटते,
".....त्याच पोट फाडत तो सुरा खाली गेला.त्या माणसाच्या पायजम्याची नाडीही कापली गेली. त्या सुराधारी माणसानं पाहिलं आणि तो अतिशय खेदपूर्वक म्हणाला, ओह! मिस्टेक!"
मंटोच्या कथा कधी कधी वाचता वाचता माणूस सुन्न होऊन काही वेळ पुस्तक बाजूला ठेऊन देतो इतक्या विलक्षण अंगावर येणाऱ्या या कथा आहेत.
त्यामुळे सेन्सॉरने कितीही कापले तरी अंगावर येणारे संवाद येतातच. मुळात फाळणीसारख्या काही घटना इतक्या दाहक असतांना भाषा तरी कशी पवित्र राहील ?
त्यामुळे सेन्सॉरने कितीही कापले तरी अंगावर येणारे संवाद येतातच. मुळात फाळणीसारख्या काही घटना इतक्या दाहक असतांना भाषा तरी कशी पवित्र राहील ?
हरीश करमचंदानी म्हणतात तस, फाळणी म्हणजे न टाळता येणार इतिहासातील एक दुर्दैवी पान
हां, सदि के इस मलीन छोर को चाह कर भी आप अलग नही कर पायेंगे, इतिहास कि किताब से |
उजला समय जब पलटेगा पन्ना, इस पर जरूर अटकेगी उसकी नजर .
उजला समय जब पलटेगा पन्ना, इस पर जरूर अटकेगी उसकी नजर .
-समाधान महाजन
